शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शासकीय आदेशाअभावी शासकीय तूर खरेदी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शेतीमालाची मळणी सुरू झाल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्र सुरू होतात. मात्र तूरीची मळणी सुरू होऊनही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शेतीमालाची मळणी सुरू झाल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्र सुरू होतात. मात्र तूरीची मळणी सुरू होऊनही खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे तूर खरेदीत शेतकऱ्यांची मोठी लुट सुरू आहे. शासनाने तातडीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश महामंडळाला द्यावा, अशी मागणी तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.

केद्र सरकारने तूरीला प्रति क्विंटल ६ हजार रुपये हमीभाव जाहीर केला आहे. चालूवर्षी वेळेवर पाऊस पडला. त्यामुळे तूरीची वेळेवर पेरणी झाली. सध्या तूरीची मळणी सुरू आहे. पिक काढणीला येण्यापूर्वीच खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. मात्र मळणी सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला. अतिवृष्टीमुळे बळीराजा अर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचाही नाईलाज आहे. त्यामुळे शेतकरी तूर मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना विकत आहेत. बाजारात तुरीची आवक वाढल्याचे कारण देऊन माल खाली करून घेतला जात नाही. यंदा पोषक वातावरण असल्यामुळे तरीच्या उत्पादनातही वाढ झालेली आहे. तूरीतून मोठे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतू, खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्याचा प्रति क्विंटल १००० ते १२०० रुपये तोटा होत आहे. जवळची तूर व्यापाऱ्यांना विकल्यानंतर शासनाचे खरेदी केंद्र सुरू होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर टप्प्या-टप्प्याने शेतकऱ्यांना माल घेऊ येण्याबाबत कळविले जाते. ही पध्दत वेळखाऊ आहे. त्यामुळे नोंदणी कधी होणार आणि आपला नंबर कधी लागणार, यामुळे शेतकरी तूर व्यापाऱ्यांकडे स्त:हून घेऊन जात असून, शासकीय खरेदीसाठी अद्याप नोेंदणी सुरू झालेली नाही. त्यामुळे तुर शासकीय तूर खरेदी सुरू होण्यास फेब्रुवारी महिना उजडेल, असे दिसते.

....

मुग व्यापाऱ्यांच्या घशात

जिल्ह्यातील ६८७ शेतकर्यांनी मुग विक्रीसाठी ऑनालईन नोंदणी केली होती. यापैकी २३४ शेतकऱ्यांनी मुग खरेदी केंद्रात आणून विकला. उर्वरित शेतकऱ्यांनी मुग व्यापाऱ्यांना विकला असून, वर्षभरात १ हजार १५५ क्विंटल मुगाचीच फक्त खरेदी झाली आहे.

...

११२ क्विंटल उडीदाचीच खरेदी

केंद्र शासनाने उडीदाला प्रति क्विंटल ६ हजार रुपये भाव जाहीर केला होता. जिल्ह्यातील ४७ शेतकर्यांनीच महामंडळाच्या पोर्टलवर नोंदणी केली होती. त्यापैकी १६ शेतकऱ्यांनीच फक्त मुग शासकीय खरेदी केंद्रात दिला. उर्वरित शेतकर्यांना उडीद व्यापाऱ्यांना विकला.

..

सोयाबीनची शासकीय खरेदी शून्य

केद्र शासनाने सोयाबीनला ३ हजार ८८० रुपये भाव जाहीर केला होता. जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. परंतु, एकाही शेतकऱ्याने खरेदी केंद्रात सोयाबीन विकली नाही.

..

मका खरेदी जोरात

शासनाने मकाला १ हजार ८५० रुपये भाव जाहीर केला आहे. जिल्ह्यातील मका उत्पादक २ हजार ९२२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोेंदणी केली असून, अत्तापर्यंत ६२९ शेतकऱ्यांकडून मकाची खरेदी करण्यात आली आहे.

...