शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तलावातील पाणी वाटपाचे खाजगीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST

बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : राज्यातील तलाव व कालव्यातील पाणी शेती सिंचनासाठी खासगी अगर सहकारी संस्थांना लिलाव पध्दतीने देण्याचे धोरण ...

बाळासाहेब काकडे

श्रीगोंदा : राज्यातील तलाव व कालव्यातील पाणी शेती सिंचनासाठी खासगी अगर सहकारी संस्थांना लिलाव पध्दतीने देण्याचे धोरण सरकारने घेतले आहे. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर व कुकडीचा १३२ जोड कालव्याचे टेंडर काढण्याची प्रकिया सुरू झाली आहे.

राज्य शासनाने छोटे धरण, तलाव पाणीवाटपाचे नियोजन हे खासगी सहकारी संस्थांमार्फत करण्याचे परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक कृष्णा खोरे विकास महामंडळ, तापी खोरे, गोदावरी खोरे, विदर्भ आणि कोकण खोरे विकास महामंडळ यांना दिले आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाने खाजगी संस्थेमार्फत त्रैवार्षिक पध्दतीने नियोजन करण्यासाठी विसापूर व कुकडीचा १३२ जोड कालव्याची शिफारस केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपताच टेंडर काढण्याची प्रकिया सुरू होणार आहे. विसापूर तलाव व कुकडी कालव्याचे पाणीवाटपाचे तीन वर्षांसाठी टेंडर काढले जाणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व सहकारी पाणीवापर संस्था टेंडर घेणाऱ्या एजन्सीला जोडल्या जाणार आहेत. खाजगी एजन्सी पाणीवापर संस्थांना पाणी देणार आहे. पाणीपट्टी सहकारी पाणीवापर संस्थांनी एजन्सीला देणे बंधनकारक राहणार आहे. खाजगी एजन्सी कालवा चाऱ्यांची देखभाल करणार आहे.

....

विसापूर तलावाचा प्रवास

हंगा नदीवर विसापूर तलाव इंग्रजांनी १८९६ ते १९२७ दरम्यान बांधला. निंबवी, विसापूर, पिंपळगाव पिसा, बेलवंडी, पारगाव, लोणीव्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, चिंभळे, मढेवडगाव, शिरसगाव बोडखा, पिसोरे या गावांतील १३ हजार १४३ एकर क्षेत्र ओलिताखाली आले. कुकडी प्रकल्प झाला. कुकडीचे १३२ जोड कालव्यावर विसापूरखालील सुमारे पाच एकर क्षेत्र हस्तांतर झाले.

....

पाण्याचा गैरवापर थांबणार

विसापूर तलाव व कुकडी जोड कालव्यावर असलेल्या सहकारी पाणीवापर संस्था व कृषी व ग्रामपंचायत उचल पाणीवापर संस्था मासेमारीवाले हे टेंडर घेणाऱ्या एजन्सीच्या अधिपत्याखाली घेणार आहेत. सर्वांकडून शासकीय नियमानुसार पाणीपट्टी वसूल केली जाईल. जास्त पाणीपट्टी कुणाकडून वसूल केली जाणार नाही. मात्र, आता सर्वांना पाण्याचे मोजमाप लावले जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर थांबण्यास मोठी मदत होणार आहे, असा जलसंपदा विभागाने दावा केला आहे.

..

..