शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

...यासाठी हवीय दूध उत्पादक शेतक-यांना दरवाढ?

By अनिल लगड | Updated: August 2, 2020 14:07 IST

कोरोनामुळे शेतकरीही मोठ्या अडचणीत आला आहे. कांद्याला भाव नाही. दुधाचे दर कोसळले आहेत. यामुळे शेतक-यांचे आर्थिक चक्रच बदलून गेले आहे. सध्या दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अजून तरी सरकारला जाग आलेली दिसत नाही. परंतु शेतक-यांचा दूध उत्पादनाचा आणि खर्चाचा कुठेच ताळमेळ बसत नाही. फक्त यासाठीच शेतक-यांना दुधाला दरवाढ हवी आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरीही मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. याचा मोठा फटका दूध उत्पादक शेतक-यांना बसला आहे. कोरोनामुळे राज्यात ५२ लाख लीटर दूध अतिरिक्त ठरत आहे. आंतरराष्टÑीय बाजारात दूध पावडरला मागणी नसल्याने राज्यात दूध पावडरचे साठे गोदामात पडून आहे. या पार्श्वभूमीवर दुधाचे दर कोसळले आहेत.

   दुधाला भाव नसल्याने शेतक-यांचे अर्थचक्र पूर्ण कोलमडून गेले आहे. सध्याचा दुधाचा भाव शेतक-यांना परवडणारा नाही. यामुळे शेतकरी संघटना, भाजप, माकप, भापकसह विविध संघटना दूध दरवाढीसाठी पुढे सरसावल्या आहेत. यामुळे दूध संघांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. 

दुधाला ३० रुपये प्रतीलिटर भाव द्यावा. राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटरमागे १० लिटर अनुदान द्यावे. अनुदान शेतक-यांच्या खात्यात वर्ग करावे. केंद्राने दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीचे धोरण तातडीने मागे घ्यावे. दूध पावडरसाठी ५० रुपये प्रतिकिलो अनुदान द्यावे, या मागणीसाठी भाजप, रयत क्रांती शेतकरी संघटना, रासप, रिपाइं, किसान सभा, मनसेतर्फे राज्यातील हजारो गावात शनिवारी (१ आॅगस्ट) पुन्हा आंदोलने झाली. परंतु शेतक-यांच्या दूध उत्पन्न खर्चाचा आणि सध्याच्या दुधाचा लिटरच्या भावाचा विचार केला तर खूप मोठी तफावत आहे. जर सरकारने वेळीच लक्ष दिले नाही तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही. अन् शेतकरी कर्जबाजारी झाला की तो आत्महत्येचा मार्ग पत्करतो, हे ठरलेलेच आहे. तरी राज्य सरकारने तातडीने शेतक-याला दुधाला ३० ते ४० रुपये लिटर भाव देऊन त्याला दिलासा देण्याची गरज आहे. 

एका गायीपासून मिळणारे उत्पन्न असे...१५ ते २० लिटर दूध देणारी गाय खरेदी -४० ते ६० हजार रुपयांना खरेदी करावी लागते. गाय सरासरी १२० दिवस पूर्ण क्षमतेने १५ ते २० लिटर दूध देते. त्यानंतर पुन्हा १२० दिवस कमी जास्त प्रमाणात दूध देते. १६५ दिवस ती भाकड राहते. परंतु ती शेतक-याला वर्षभर सांभाळावी लागते. तिचा नेहमीचा खर्च मात्र करावाच लागतो. ही गाय सरासरी रोज १८ लिटर दूध देते असे धरले तर २४० दिवसांचे ४३२० लिटर दूध होते. त्याचा भाव सरासरी १८ रुपये धरला तर एकूण उत्पन्न ७७ हजार ७६० रुपये होतात. त्यात गायीच्या शेणाचा शेतकरी खत म्हणून वापर करतो. त्याचे उत् पन्न ५००० रुपये धरले तर एका गायीचे ८२ हजार ७६० असे एकूण उत्पन्न मिळते. 

एका गायीसाठी होणारा खर्च असा....शेतक-याला एका गायीपासून सरासरी ८२ हजार ७६० असे उत्पन्न मिळते असे आपण समजू. आता शेतक-यांच्या खर्चाचा विचार केला तर एका गायीस सरकी महिन्यास दोन पोते लागते. त्याचा भाव १३०० आहे. दोन पोत्याचे २६०० रुपये होतात. यात मका भरडा टाकावा लागतो. त्याचा खर्चही २८०० रुपये होतो. घास, गिणी गवत, कोरडा भुसा किंवा घासाच्या पेंढ्या रोज १०. घासाची पेंढी ७ रुपयाला मिळत नाही. तरी पेंढी सात रूपये धरली तर ७० रुपये होतात. यात कोरडा चारा, गवत सोडून दिले (शेतकरी बारीक विचार करीत नाही) तरी निव्वळ घासाचे ७० गुणीले महिन्याचे ३० दिवस केले तर २१०० रुपये होतात. असा दरमहा ७५०० रुपये खर्च होतो. दिवसाला २५० रुपये रोज खर्च शेतक-याला एका गायीमागे करावा लागतो. 

दहा हजारांचा तोटावर्षाचा ३६५ दिवसाचा खर्चाचा विचार केला एकूण खर्च ९१ हजार २५० रुपये होतो. म्हणजे वर्षाला कमीत कमी खर्च धरला तर शेतक-याचा वर्षाला ८ ते १० हजार रुपयांचा तोटा होतो. याशिवाय पशुवैद्यकीय डॉक्टरचा खर्च, घरातील गायीची सोडबांध करणे, धारा काढणे, वासरु पाजणे, धुणे आदी विविध कामे दिवसभर करावीे लागतात. त्याचा खर्च तर वेगळाच आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरmilkदूधFarmer strikeशेतकरी संप