अहमदनगर : शहरातील चौकाचौकांना गराडा घालणाऱ्या पोलिसांना पाहून शहरातील वाहनधारक चांगलेच धास्तावले आहेत. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा धडाका सुरू असून गेल्या चार दिवसांपासून चारशे जणांवर कारवाई करण्यात आली आहे.सिग्नल तोडून पुढे जाणे, झेब्रा क्रॉसिंग ओलांडणे, ट्रिपल शीट, रहदारीस अडथळा करणे, नियम तोडल्यानंतर वाहनाची मूळ कागदपत्रं न बाळगणे, कोरी नंबर प्लेट, चित्रविचित्र नंबर प्लेट, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, विना नोंदणी वाहन, चारचाकी वाहनांमध्ये अवैध वाहतूक, मोठ्याने हॉर्न वाजवित जाणाऱ्यांना पोलिसांची चांगलीच जरब बसली आहे. एकाच दिवशी शहरातील प्रत्येक चौकात दोन-दोन तास थांबून वाहतूक शाखेचे पोलीस वाहनधारकांना शिस्त लावत आहेत. नियम मोडले त्यांना जागेवरच दंड आकारण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून चारशे जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)शहरामध्ये अतिक्रमणे, अरुंद रस्ते, वाहनांची वाढलेली संख्या, प्रत्येकाला जाण्याच्या घाईमुळे वाहतुकीला शिस्त लावणे कठीण होत आहे. जास्तीत जास्त वाहतुकीला सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.-ज्ञानेश्वर ढोकले, पोलीस निरीक्षक
नियम मोडणाऱ्यांना पोलिसांचा चाप
By admin | Updated: July 25, 2014 00:25 IST