शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दरवर्षी वृक्ष लागवड मात्र संगाेपनाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST

करंजी : पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगररांगांमध्ये दरवर्षी वनविभाग मार्फत लाखो झाडांचे रोपण करण्यात येते. मात्र त्याच्या संवर्धनाची व जंगलाची ...

करंजी : पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगररांगांमध्ये दरवर्षी वनविभाग मार्फत लाखो झाडांचे रोपण करण्यात येते. मात्र त्याच्या संवर्धनाची व जंगलाची काळजी न घेतल्याने शासनाच्या लाखो रूपयांचे दरवर्षी नुकसान होत आहे.

पाथर्डी तालुक्यातील करंजीसह परिसरात गर्भगिरी डोंगरावर दरवर्षी हजारो वृक्षांची लागवड केली जाते. गेल्या १० वर्षांपासून या भागात ही वृक्ष लागवड केली जाते. फक्त शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी लागवड करायची आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घ्यायचीच नाही, असा एककलमी कार्यक्रम वनविभाग राबवत आहे. त्यामुळे शासनाचे दरवर्षी लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. यावर्षी उन्हाळ्यात गर्भगिरी डोंगरास दोन वेळा आग लागून शेकडो हेक्टर क्षेत्र त्यात जळून भस्मसात झाले. दोन वेळा लागलेल्या आगीत मोठ-मोठी वृक्ष जळून खाक झाली.

दरवर्षी करंजीसह परिसरातील दगडवाडी, वैजूबाभूळगाव, पवळवाडी, खंडोबावाडी, श्री क्षेत्र वृद्धेश्वरच्या डोंगरात वृक्ष लागवड केली जाते. किती वर्ष वनविभाग वृक्ष लागणार असल्याचा सवाल वृक्षप्रेमींतून विचारला जात आहे.

दरवर्षी लागवड करण्यापेक्षा आहेत त्या झाडांचे संगोपन तसेच आगीपासून संरक्षण करण्याची दक्षता घ्यावी, अशी मागणी या भागातील सागर कराळे, तुळशीदास शिंदे, महेश शिंदे, रामनाथ शिंदे, जालिंदर पवार, नवनाथ, उद्धव शिंदे, अनिल शिंदे, विशाल कराळे, योगेश शिंदे, उमेश शिंदे, देविदास शिंदेसह अनेक वृक्षप्रेमींनी केली आहे.

----

करंजीसह दगडवाडी, पवळवाडी, खंडोबावाडी, वैजूबाभळगाव परिसरात दरवर्षी वनविभागामार्फत वृक्ष लागवड केली जाते. मात्र त्याचे संवर्धन न केल्याने शासनाचा खर्च वाया जातो.

-सागर कराळे,

वृक्षमित्र, दगडवाडी