शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

खाली खड्डे, वर अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:25 IST

अहमदनगर : मुसळधार पावसामुळे शहर व परिसरातील रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे नगरकरांचे कंबरडे मोडले आहे. त्यात पथदिवे ...

अहमदनगर : मुसळधार पावसामुळे शहर व परिसरातील रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे नगरकरांचे कंबरडे मोडले आहे. त्यात पथदिवे बंद असल्याने अंधाराची भर पडली आहे. रस्त्यावरील पथदिवे, चौकांतील सिग्नल, गल्लीतील विद्युत दिवे बंद आहेत. त्यामुळे खाली खड्डे आणि वर अंधार, अशी परिस्थिती मंगळवारी सायंकाळी संपूर्ण नगर शहरात पाहायला मिळाली.

शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन उपाययोजना करणे अपेक्षित होते. मार्च ते एप्रिल या काळात संपूर्ण लॉकडाऊन होता. या काळात रस्ते मजबुतीकरणासह खड्डे बुजविण्याची संधी होती. विनाअडथळा रस्त्यांची दुरुस्ती करता आली असती. मात्र, या काळात महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हातावर हात धरून बसले होते, अशा तक्रारी आता नागरिक करीत आहेत.

विशेष करून, नगर-मनमाड रोड, पत्रकार चौक ते डीएसपी चौक, औरंगाबाद रोडवरील महापालिका ते वसंत टेकडी, पत्रकार चौक ते दिल्लीगेट, अमरधाम रोड, कल्याण रोड, सक्कर चौक ते मार्केट यार्ड चौक, दिल्लीगेट ते जुनी महापालिका रोड, जुना पिंपळगाव रोड, गुलमोहोर रोड, माळीवाडा ते मिरवणूक मार्ग अशा सर्वच रस्त्यांवर अंधार होता.

प्रशासकीय प्रमुख आयुक्त शंकर गोरे यांनी भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खड्ड्यात घसरून अनेक जण जखमी झाले. काही जण खड्ड्यात पडले. अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले. महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर खड्डेमुक्त नगर करण्याची घोषणा महापालिकेतील महाविकास आघाडीने केली खरी, पण त्या दिशेने पावले टाकली गेली नाहीत. त्यामुळे पावसाळा सुरू होताच, नगरकरांचे कंबरडे मोडले. रस्त्यावर प्रकाश असता, तर किमान खड्डे तरी दिसले असते, पण इथे तीही सोय नाही. त्यामुळे वाहनांच्या प्रकाशात नागरिकांना मार्ग शोधावा लागत आहे.

---

स्मार्ट एलईडीसाठी अंधार

रस्त्यांवरील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. स्मार्ट एलईडी प्रकल्प येणार येणार म्हणून बंद पडलेले पथदिवे दुरुस्तच करण्यात आले नाहीत. दोन महिने उलटून गेले, पण स्मार्ट एलईडी प्रकाश पडला नाही. उलटपक्षी खड्डे पडलेल्या रस्त्यावरील प्रकाश गायब झाला. त्यामुळे अंधारात चाचपडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

---------

कराच्या पैशातून ठेकेदाराची बिले

महापालिकेकडून सक्तीने करवसुली केली जाते. कर रूपाने जमा होणाऱ्या पैशातून पायाभूत सुविधा न पुरविता ठेकेदारांची बिले अदा केली जातात. कराचे पैसे जमा होण्याआधी लेखा विभागात ठेकेदारांची हातभर यादी तयार असते. त्यामुळे खड्डे बुजविणारे आणि विद्युत साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदारांचे बिल देण्यासाठी पैसेच शिल्लक राहत नाहीत. काम केल्याचे पैसे वेळवर मिळत नसतील, तर काम करायचे कशासाठी, असा ठेकेदारांचा प्रश्न आहे. खड्डे बुजविण्यासाठी दोन महिने ठेकेदारच मिळाला नाही. म्हणून खड्डे बुजवायला सप्टेंबर महिना उजडला.

....