शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या बाजूने ओव्हरटेक, शॉर्टकट्स वापर ठरू शकतो जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST

संगमनेर : रस्त्यांवर अपघात होण्यास मानवी चूक सर्वात जास्त जबाबदार आहे. बऱ्याच वेळेला वाहनचालक थोडीशी जागा मिळाल्यानंतर चुकीच्या बाजूने ...

संगमनेर : रस्त्यांवर अपघात होण्यास मानवी चूक सर्वात जास्त जबाबदार आहे. बऱ्याच वेळेला वाहनचालक थोडीशी जागा मिळाल्यानंतर चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करतात. अशा वेळेला समोरून येणाऱ्या वाहनचालकाला हे माहीत नसते. तसेच वेळेची बचत म्हणून चालकांकडून काही ठिकाणी शॉर्टकट्स वापर करण्यात येतो आहे. त्यामुळे चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे, शाॅर्टकट्सचा वापर करणे असे प्रकार जीवघेणे ठरू शकतात.

वाहन चालवताना वेग हा रस्त्याची स्थिती, रहदारी व वाहनाची स्थिती लक्षात घेऊन मर्यादित ठेवावा. अती वेगाने वाहन चालवल्यास अपघात होण्याची शक्यता असते. संगमनेर शहरातून जुना नाशिक-पुणे महामार्ग, कोल्हार-घोटी राज्यमार्ग जातो. शहरात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी काही वर्षांपूर्वी नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गाची निर्मिती करण्यात आली. मात्र, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे, वेळेची बचत व्हावी म्हणून शॉर्टकट्स वापर करणे हे प्रमाण येथे वाढले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महामार्ग पोलीस, संगमनेर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते.

शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एक फलक गेल्या अनेक वर्षांपासून लावला आहे. त्यावर काही सूचना लिहिलेली आहे. ती पुसली गेली असून त्यावर ‘फक्त प्रवेश’ एवढेच लिहिलेले दिसते. बाह्यवळण महामार्ग झाल्याने शहरात अपघातांचे प्रमाण कमी झाले आहेत. मात्र, वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणे. संगमनेर नगरपरिषदेचे वाहनतळ संदर्भात धोरण नसणे. सुमारे ३५ लाख रूपये खर्च करून शहरात उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था सुरू होण्यापूर्वीच बंद असून त्यावरील दिवे देखील गायब आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या अजूनही सुटलेली दिसत नाही.

नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गाच्या उजव्या व डाव्या या दोन्ही बाजूस गावे आहेत. या गावांमध्ये जाण्यासाठी सर्व्हिस रस्त्यांचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, काही वाहन चालकांकडून सर्व्हिस रस्त्यांचा वापर होत नाही. ते गावात जाण्यासाठी चुकीच्या पद्धतीने शॉर्टकट्स वापर करतात. त्यामुळे देखील छोटे-मोठे अपघात घडतात. शहरातून जाणारा जुना नाशिक-पुणे महामार्ग आणि नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्ग ज्या ठिकाणी एकत्र येतो, तेथे घुलेवाडी बायपास चौकात देखील वाहनचालक चुकीच्या दिशेने वाहने घेऊन जात असल्याने वाहनांची धडक होऊन यापूर्वी अपघात झाले आहेत.

-------------

सर्व्हिस रस्ता नसल्याने अपघात

संगमनेरातून अकोलेकडे जाताना नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावरील उड्डाणपुलाखालून जावे लागते. बाह्यवळण महामार्गाने नाशिकच्या दिशेने वाहन घेऊन येणाऱ्या वाहनचालकांना संगमनेर शहरात येण्यासाठी सर्व्हिस रस्ता आवश्यक आहे. मात्र, येथे सर्व्हिस रस्ता नसल्याने संगमनेर शहरात जाण्यासाठी वाहनचालकांना काही अंतर पुढे जाऊन डाव्या बाजूने वाहन घेऊन वळावे लागते. त्यामुळे नाशिकच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना पुढे वाहन वळत असल्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनांची धडक होऊन येथे झालेल्या अपघातात काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

---------------

चुकीच्या दिशेने झालेले अपघात -२ (नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्ग)

मृत्यू - २

जखमी - २

चुकीच्या दिशेने दंड - साधारण ८० हजार रूपये

------------

संगमनेर तालुक्यात तीन ब्लॅक स्पॉट

एकाच ठिकाणी तीन वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जीव गेला तर त्या जागेला ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणतात. चंदनापुरी घाट, सायखिंडी फाटा, घुलेवाडी बायपास चौक हे तीन ब्लॅक स्पॉट संगमनेर तालुक्यात आहेत. असे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी सांगितले.

-----------

प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाची प्राथमिक तपासणी करावी. वाहन चालविताना वेग मर्यादा पाळणे बंधनकारक आहे. ओव्हरटेक करणे टाळावे. रस्त्यांच्या कडेला लावलेला चिन्ह फलक तसेच माहितीपत्रक बघा आणि वाचा. नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या गावात जाण्यासाठी सर्व्हिस रस्ते आहेत. वाहन चालकांनी या रस्त्यांचा वापर करावा. शॉर्टकट्स वापर केल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

- भालचंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक तथा डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्र प्रमुख