शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

जैविक खते शाश्वत शेतीचा मूलभूत घटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:17 IST

कृषी विभागाच्या वतीने निंबोडी (ता. नगर) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्माअंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

कृषी विभागाच्या वतीने निंबोडी (ता. नगर) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्माअंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. दहातोंडे यांनी ‘संत्रा पीक बहर व्यवस्थापन व लागवड’ या विषयावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, ऑरेंज व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अंबादास बेरड, उपसरपंच भीमा बेरड, श्रीकांत जावळे, संजय मेहेत्रे, उमेश डोईफोडे, रमेश लगड यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

डॉ. दहातोंडे पुढे म्हणाले की, जैविक खतांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत होऊन जमिनीचा पोत सुधारतो. नैसर्गिक पद्धतीने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. पिकांच्या उत्पादनात वाढ होते. जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या प्रतिजैविकांमुळे पिकांची रोग व कीड प्रतिकारक शक्ती वाढते व संजीवकांमुळे बियाणांची उगवण शक्ती वाढून पिकांची चांगली वाढ होते. यात जमीन, पाणी व पिकांसाठी अपायकारक रसायने नसतात. ही खते तुलनेत स्वस्त असल्याने उत्पादनखर्चात बचत होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप म्हणाले की, शेतकरी पिकवितो; परंतु विक्री व्यवस्थापनाकडे लक्ष देत नाही. नागपूर संत्राबरोबर नगर संत्र्याचे नाव राज्यात झळकायला हवे. कृषी विभागाच्या माध्यमातून गटशेती करावी. जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन झपाट्याने वाढत आहे. तंत्रशुद्ध शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधला पाहिजे.

गहिनीनाथ कापसे यांनी ‘संत्रा पिकावरील बहर व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन केले. नवले यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. संत्रा उत्पादक शेतकरी उमेश लगड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय मेहेत्रे यांनी केले. आभार उमेश डोईफोडे यांनी मानले.

-------

फोटो - २५कृषी संवाद

आत्माअंतर्गत ‘किसान गोष्टी कार्यक्रम’प्रसंगी निंबोडी येथे अंबादास बेरड यांच्या संत्रा बागेची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधताना दहीगाव-ने कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. नंदकिशोर दहातोंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, विभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे आदींसह कृषी अधिकारी.