शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांना गावचा चेहरामोेहरा बदलण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:23 IST

श्रीरामपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. येथे मुख्य कार्यकारी अधिकारी व ...

श्रीरामपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. येथे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना निर्णयाचे अधिकार आहेत. मात्र, ग्रामपंचायतीमध्ये सर्वस्वी सरपंच यांनाच स्वतंत्र भूमिका बजावता येते. त्यामुळे ग्रामीण भागात विकास करून चेहरामोहरा बदलून टाकण्याची त्यांना संधी आहे, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले. तालुक्यातील टाकळीभान येथे मंगळवारी रुक्मिणी माधव मंगल कार्यालयात १३ ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार लहू कानडे बोलत होते.

जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, इंद्रनाथ पाटील थोरात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरूण नाईक, वंदना मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, विष्णूपंत खंडागळे, प्रा. कार्लस साठे, राजेंद्र कोकणे आदी यावेळी उपस्थित होते.

कानडे म्हणाले, ग्रामपंचायत हे शंभर टक्के सरकारी कार्यालय आहे तर सरपंच व ग्रामसेवक हे लोकसेवक आहेत. त्यामुळे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी जनतेच्या मूलभूत गरजा सोडवून गावाचा विकास करण्यासाठी सर्वाधिक प्रयत्नशील रहावे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करावा व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

----------