शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

राहाता तालुक्यात अवघ्या तीन टक्के खरिपाच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

यावर्षी चांगला पाऊस पडेल व खरिपाची पिके जोमात येतील व गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतीत झालेले आर्थिक नुकसान या ...

यावर्षी चांगला पाऊस पडेल व खरिपाची पिके जोमात येतील व गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतीत झालेले आर्थिक नुकसान या पिकाच्या उत्पन्नातून काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. या अपेक्षेने शेतकऱ्यांनी वेळेवर शेतीची मशागत केली. बियाणे, रासायनिक खते खरेदी करून ठेवली; परंतु पावसाने दडी मारल्याने वेळेवर पेरणी होत नाही म्हणून पुन्हा डोक्यावर कर्जाचा बोजा वाढेल, ही भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. पर्यायाने शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. अनेक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात शेतीमालाची विक्री करावी लागली. यामुळे राहाता तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला आहे. त्यातच यावर्षी पावसाने पाठ दाखविल्याने तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

राहाता तालुक्यात शेतीला पूरक समजला जाणारा दूध व्यवसायही अडचणीत आहे. ३२ रुपये लिटरप्रमाणे विक्री होत असलेले दूध १७ ते २० रुपये प्रतिलिटर याप्रमाणे शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. त्यामुळे शेतीमालाबरोबरच दूध व्यवसाय अडचणीत सापडल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते पूर्णतः बिघडलेली आहेत.

यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस होईल व खरिपाची पेरणी वेळेत होऊन सोयाबीन मका व फळबागेपासून चांगले उत्पन्न मिळून कोरोनामुळे शेतीमालाची झालेली आर्थिक हानी कमी होण्यास मदत होईल, ही अपेक्षा बळीराजाला होती; परंतु मृग नक्षत्र संपून २१ जूनपासून सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश झाला तरी वरुणराजाची कृपा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

.......................

मागील वर्षी २२ जूनअखेर राहाता तालुक्यात ५० टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या; परंतु यावर्षी २१ जूनपर्यंत अवघ्या ३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाची पेरणी ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यावरच करावी, असे राहाता तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले आहे.

......................................

राहाता तालुक्यातील गणेश परिसरात शेती सिंचनासाठी दारणा, गंगापूर धरणांतून पाण्याचे आवर्तन मिळते, तर प्रवरा परिसरात भंडारदरा धरणातून पाण्याचे आवर्तन मिळते; परंतु धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने धरणात पाणीसाठा पुरेसा नसून, वेळेत पाऊस झाला नाही, तर नागरिकांना पिण्यासाठी पाणी आरक्षण होऊ शकते.

............................

२४ जूनअखेर राहाता तालुक्यात पडलेला पाऊस

राहाता-२५ मि.मी., शिर्डी- २२ मि.मी., चितळी २५ मि.मी., रांजणगाव ३४ मि.मी., अशी पावसाची नोंद झाली आहे, तर मागील वर्षी २४ जूनअखेर राहाता १६७ मि.मी., शिर्डी- १२३ मि.मी., चितळी- १४० मि.मी., रांजणगाव- १७३ मि.मी. याप्रमाणे पावसाची नोंद झाली होती.