शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

राहाता तालुक्यात अवघ्या तीन टक्के खरिपाच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

यावर्षी चांगला पाऊस पडेल व खरिपाची पिके जोमात येतील व गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतीत झालेले आर्थिक नुकसान या ...

यावर्षी चांगला पाऊस पडेल व खरिपाची पिके जोमात येतील व गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतीत झालेले आर्थिक नुकसान या पिकाच्या उत्पन्नातून काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. या अपेक्षेने शेतकऱ्यांनी वेळेवर शेतीची मशागत केली. बियाणे, रासायनिक खते खरेदी करून ठेवली; परंतु पावसाने दडी मारल्याने वेळेवर पेरणी होत नाही म्हणून पुन्हा डोक्यावर कर्जाचा बोजा वाढेल, ही भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. पर्यायाने शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. अनेक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात शेतीमालाची विक्री करावी लागली. यामुळे राहाता तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला आहे. त्यातच यावर्षी पावसाने पाठ दाखविल्याने तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

राहाता तालुक्यात शेतीला पूरक समजला जाणारा दूध व्यवसायही अडचणीत आहे. ३२ रुपये लिटरप्रमाणे विक्री होत असलेले दूध १७ ते २० रुपये प्रतिलिटर याप्रमाणे शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. त्यामुळे शेतीमालाबरोबरच दूध व्यवसाय अडचणीत सापडल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते पूर्णतः बिघडलेली आहेत.

यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस होईल व खरिपाची पेरणी वेळेत होऊन सोयाबीन मका व फळबागेपासून चांगले उत्पन्न मिळून कोरोनामुळे शेतीमालाची झालेली आर्थिक हानी कमी होण्यास मदत होईल, ही अपेक्षा बळीराजाला होती; परंतु मृग नक्षत्र संपून २१ जूनपासून सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश झाला तरी वरुणराजाची कृपा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

.......................

मागील वर्षी २२ जूनअखेर राहाता तालुक्यात ५० टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या; परंतु यावर्षी २१ जूनपर्यंत अवघ्या ३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाची पेरणी ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यावरच करावी, असे राहाता तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले आहे.

......................................

राहाता तालुक्यातील गणेश परिसरात शेती सिंचनासाठी दारणा, गंगापूर धरणांतून पाण्याचे आवर्तन मिळते, तर प्रवरा परिसरात भंडारदरा धरणातून पाण्याचे आवर्तन मिळते; परंतु धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने धरणात पाणीसाठा पुरेसा नसून, वेळेत पाऊस झाला नाही, तर नागरिकांना पिण्यासाठी पाणी आरक्षण होऊ शकते.

............................

२४ जूनअखेर राहाता तालुक्यात पडलेला पाऊस

राहाता-२५ मि.मी., शिर्डी- २२ मि.मी., चितळी २५ मि.मी., रांजणगाव ३४ मि.मी., अशी पावसाची नोंद झाली आहे, तर मागील वर्षी २४ जूनअखेर राहाता १६७ मि.मी., शिर्डी- १२३ मि.मी., चितळी- १४० मि.मी., रांजणगाव- १७३ मि.मी. याप्रमाणे पावसाची नोंद झाली होती.