शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

राहाता तालुक्यात अवघ्या तीन टक्के खरिपाच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

यावर्षी चांगला पाऊस पडेल व खरिपाची पिके जोमात येतील व गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतीत झालेले आर्थिक नुकसान या ...

यावर्षी चांगला पाऊस पडेल व खरिपाची पिके जोमात येतील व गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतीत झालेले आर्थिक नुकसान या पिकाच्या उत्पन्नातून काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. या अपेक्षेने शेतकऱ्यांनी वेळेवर शेतीची मशागत केली. बियाणे, रासायनिक खते खरेदी करून ठेवली; परंतु पावसाने दडी मारल्याने वेळेवर पेरणी होत नाही म्हणून पुन्हा डोक्यावर कर्जाचा बोजा वाढेल, ही भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. पर्यायाने शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. अनेक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात शेतीमालाची विक्री करावी लागली. यामुळे राहाता तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला आहे. त्यातच यावर्षी पावसाने पाठ दाखविल्याने तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

राहाता तालुक्यात शेतीला पूरक समजला जाणारा दूध व्यवसायही अडचणीत आहे. ३२ रुपये लिटरप्रमाणे विक्री होत असलेले दूध १७ ते २० रुपये प्रतिलिटर याप्रमाणे शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. त्यामुळे शेतीमालाबरोबरच दूध व्यवसाय अडचणीत सापडल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते पूर्णतः बिघडलेली आहेत.

यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस होईल व खरिपाची पेरणी वेळेत होऊन सोयाबीन मका व फळबागेपासून चांगले उत्पन्न मिळून कोरोनामुळे शेतीमालाची झालेली आर्थिक हानी कमी होण्यास मदत होईल, ही अपेक्षा बळीराजाला होती; परंतु मृग नक्षत्र संपून २१ जूनपासून सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश झाला तरी वरुणराजाची कृपा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

.......................

मागील वर्षी २२ जूनअखेर राहाता तालुक्यात ५० टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या; परंतु यावर्षी २१ जूनपर्यंत अवघ्या ३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाची पेरणी ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यावरच करावी, असे राहाता तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले आहे.

......................................

राहाता तालुक्यातील गणेश परिसरात शेती सिंचनासाठी दारणा, गंगापूर धरणांतून पाण्याचे आवर्तन मिळते, तर प्रवरा परिसरात भंडारदरा धरणातून पाण्याचे आवर्तन मिळते; परंतु धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने धरणात पाणीसाठा पुरेसा नसून, वेळेत पाऊस झाला नाही, तर नागरिकांना पिण्यासाठी पाणी आरक्षण होऊ शकते.

............................

२४ जूनअखेर राहाता तालुक्यात पडलेला पाऊस

राहाता-२५ मि.मी., शिर्डी- २२ मि.मी., चितळी २५ मि.मी., रांजणगाव ३४ मि.मी., अशी पावसाची नोंद झाली आहे, तर मागील वर्षी २४ जूनअखेर राहाता १६७ मि.मी., शिर्डी- १२३ मि.मी., चितळी- १४० मि.मी., रांजणगाव- १७३ मि.मी. याप्रमाणे पावसाची नोंद झाली होती.