शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पुस्तकांविना भरली ॲानलाईन शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST

अहमदनगर : पाठ्यपुस्तके न मिळाल्याने यंदा पुस्तकांविना ऑनलाईन शाळा भरली असून शाळा भरून महिना लोटला तरी विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप ...

अहमदनगर : पाठ्यपुस्तके न मिळाल्याने यंदा पुस्तकांविना ऑनलाईन शाळा भरली असून शाळा भरून महिना लोटला तरी विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप पुस्तके पडलेली नाहीत.

दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाकडून दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वाटली जातात. यंदा १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु महिना होऊनही ही पुस्तके विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाकडे नवीन २३ लाख पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत जिल्हा परिषदेसह सर्व अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याचे वाटप होते. नगर जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत ४ लाख ६३ हजार विद्यार्थी असून त्यांना २४ लाख २० हजार पाठ्यपुस्तकांची गरज आहे. मागील वर्षी कोरोनामुळे जूनअखेर ही पुस्तके वाटप करण्यात आली होती. यंदाही प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नसल्या तरी ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे मुलांना पुस्तकांचे वाटप होणार आहे. तत्पूर्वी शासनाने मागील वर्षीची पुस्तके विद्यार्थ्यांकडून गोळा करण्याचे सांगितले होते. नगर जिल्ह्यात १ लाख पुस्तके गोळा झाली. उर्वरित २३ लाख पुस्तकांची मागणी जिल्हा परिषदेकडून शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र अकोले तालुका वगळता इतर पुस्तके अद्याप प्राप्त झालेली नाहीत.

----------------

जिल्हा परिषदेकडून शासनाकडे २३ लाख पुस्तकांची मागणी नोंदवली आहे. त्यातील अकोले तालुक्यासाठी पुस्तके आली आहेत. ती लवकरच विद्यार्थ्यांच्या हाती पडतील. पुरवठादाराकडून पुस्तके प्राप्त होताच इतर तालुक्यांनाही त्वरित पोहोच केले जातील.

- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

--------------

पाठ्यपुस्तके लाभार्थी विद्यार्थीसंख्या

पहिली ते पाचवी - २,७६,१७०

सहावी ते आठवी - १,८७,७९१

एकूण - ४,६३,९६१

--------------

४ टक्के पुस्तकेच आली परत

जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांना मागील वर्षी शासनाकडून एकूण २४ लाख पुस्तकांचे वाटप केले होते. यंदा ती पुस्तके परत गोळा करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. परंतु २४ लाखांपैकी केवळ १ लाख म्हणजे ४ टक्केच पुस्तके गोळा होऊ शकली.

--------------

पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार?

मागील वर्षीची पुस्तके फाटली आहेत. यंदा ॲानलाईन शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी नवीन पुस्तके आली नाहीत. सध्या सेतू अभ्यासक्रमानुसार मागील वर्षीचीच उजळणी सुरू आहे.

- सूरज गागरे, विद्यार्थी

--------------

मागील वर्षीची पुस्तके जमा करण्याबाबत शिक्षकांनी सांगितले होते. त्यानुसार पुस्तके जमा केली. आता नवीन पुस्तके अद्याप मिळालेली नाहीत. शिक्षक ऑनलाईन अभ्यास देत आहेत, त्याचीच उजळणी सुरू आहे.

- विकास शिंदे, विद्यार्थी