शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

कांदा चाळीत भरण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:21 IST

गेले वर्षभर कांद्याला चांगला भाव होता. दिवाळीमध्ये कांद्याचे भाव विक्रमी दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. भाव चांगला असल्याने आणि ...

गेले वर्षभर कांद्याला चांगला भाव होता. दिवाळीमध्ये कांद्याचे भाव विक्रमी दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. भाव चांगला असल्याने आणि पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. अगदी जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत कांद्याला चांगला भाव होता; परंतु त्यानंतर कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली. अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे बाजार बंद राहिले, तसेच हॉटेल व्यवसायही बंद असल्याने कांद्याची मागणी कमी झाली. त्यामुळे कांद्याचे भाव पडले. नगर बाजार समितीत १५ एप्रिल रोजी अखेरचा लिलाव झाला होता. त्याला कांद्याला आठशे ते हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे दर खूप कमी आहेत. कांद्याला किमान वीस रुपयांच्या पुढे भाव मिळायला हवा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, सध्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा लिलाव बंद आहेत. शिवाय भाव नसल्याने शेतकऱ्यांनी आता चाळी दुरुस्त करून किंवा नवीन चाळी तयार करून कांदा चाळीत ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक ठिकाणी सध्या कांद्याची काढणी सुरू आहे. त्यामुळे काढलेला कांदा सध्या तरी शेतातच वाळण्यास ठेवला आहे.