शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची दीड हजार प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:39 IST

अहमदनगर : जुन्या प्रकरणांचा निकाल प्रलंबित असल्याने आजही जिल्हा ग्राहक न्याय मंचाच्या पोर्टलवर दीड हजार प्रकरणे प्रलंबित असल्याचे दिसते ...

अहमदनगर : जुन्या प्रकरणांचा निकाल प्रलंबित असल्याने आजही जिल्हा ग्राहक न्याय मंचाच्या पोर्टलवर दीड हजार प्रकरणे प्रलंबित असल्याचे दिसते आहे. कोरोना काळात व्हॉर्च्युअल पद्धतीने कामकाज पूर्ण केले असल्याने नगरच्या न्याय मंचात सर्वाधिक प्रकरणे निकाली लागली आहेत, असा दावा प्रबंधकांनी केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या जिल्हा ग्राहक न्याय मंचात मोठ्या प्रमाणावर तक्रारी येतात. या तक्रारींचा निकाल लागत नाही, अशा ग्राहकांच्या तक्रारी असतात. त्यामुळे ज्या ग्राहकाचे नुकसान झाले, त्या ग्राहकाला न्याय कधी मिळणार? याबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचाच्या कामकाजाचा ‘लोकमत’ ने मंगळवारी आढावा घेतला. त्यामध्ये जुन्या प्रलंबित प्रकरणांची संख्या अधिक असल्याचे दिसते आहे. नव्याने दाखल झालेल्या प्रकरणांपैकी निकाली निघालेल्या प्रकरणांची संख्या केवळ ११. ९७ टक्केच आहे. एकूण प्रलंबित प्रकरणांच्या तुलनेत निकाली प्रकरणांची संख्या केवळ ४ टक्केच असल्याचे दिसते आहे. त्यामुळे निकालाची गती मंदावली असल्याचे दिसते आहे.

--------------

सन २०२० मधील कामकाज

जुनी प्रकरणे-१०५६

२०२० मध्ये दाखल-३५९

निकाली-४३

वर्षअखेर प्रलंबित-१३७१

----

सन २०२१ मधील कामकाज (दोन महिने)

जुनी प्रकरणे-१३७२

दोन महिन्यात दाखल-७०

निकाली- १४६ (जुने व नवे मिळून)

प्रलंबित प्रकरणे-१४४०

--------------

ऑनलाईन कामकाज कोरोना काळात व्हर्च्युअल पद्धतीने कामकाज करण्यात आले. हे कामकाज १ जूनपासून सुरू झाले होते. अनलॉक होताच पुन्हा जुलैपासून प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले. तसेच ग्राहकाला आता तक्रार करण्यासाठी मंचाकडे प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. त्याला तक्रार करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे. सुनावणीसाठी त्याला मात्र प्रत्यक्ष हजर रहावे लागेल, असे मंचाच्या प्रबंधकांनी सांगितले.

----------

प्रलंबित प्रकरणांची संख्या जास्त दिसत असली तरी त्यामध्ये अडचणी खूप होत्या. ज्यांच्या विरुद्ध तक्रारी दाखल केल्या, त्या कंपनीची कार्यालये बऱ्याचवेळा परराज्यात असतात. त्यांना नोटीस पाठविल्यानंतर ३० दिवसांची मुदत दिली जाते. या काळात त्यांच्याकडून म्हणणे प्राप्त झाले नाही किंवा प्रत्यक्ष सुनावणीस हजर राहिले नाही तर एकतर्फी निकाल दिला जातो. मात्र प्रकरणे निकाली काढण्याचा वेग आता वाढविण्यात आला आहे.

-प्रबंधक, जिल्हा ग्राहक न्याय मंच

-

डमी- नेट फोटो

०३ कम्ल्टेंट बॉक्स

०२ ग्राहक मंच डमी