शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जिल्ह्यात दीडशे शाळांची घंटा वाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मध्यंतरी डिसेंबर, २०२० मध्ये प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, दहावी-बारावीचे वर्ग सुरू ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मध्यंतरी डिसेंबर, २०२० मध्ये प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, दहावी-बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते, परंतु कोरोनाची दुसरी लाट येऊन संसर्ग वाढल्याने, पुन्हा मार्च, २०२१ पासून वर्ग बंद करण्यात आले. पुढे ही लाट कमी होतानाची कोणतीही चिन्हे नसल्याने, शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. यात आठवीपर्यंतच्या मुलांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश दिला गेला, तर दहावी व बारावीच्या निकालांतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावण्याचा निर्णय झाला.

दरम्यान, २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे ॲानलाइन पद्धतीनेच सुरू झाले. काही गावे हळूहळू कोरोनामुक्त होऊ लागली. अशा कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी शासन निर्णय काढून सूचना दिल्या. त्यानुसार, शाळा सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या ठरावावर, तसेच पालकांच्या संमतीवर सोपविण्यात आली. नगर जिल्ह्यात एकूण १,५९६ गावे असून, त्यातील ८४९ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. जिल्ह्यात आठवीपासून बारावीपर्यंत सुमारे तेराशे शाळा आहेत. या शाळांमधून ठराव मागवून १५ जुलैपासून शाळा सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या एकूण १,३०१ शाळा असून, त्यातील एकूण पट ३७ हजार ९२३ एवढा आहे. त्यापैकी १५ जुलैला १३३, तर १६ जुलैला १५१ शाळा जिल्ह्यात सुरू झाल्या असून, त्यात १४ हजार ७७८ विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.

----------

सर्वाधिक शाळा अकोले, राहात्यात

सुरू झालेल्या १५१ शाळांपैकी सर्वाधिक ४६ शाळा अकोले, तर २४ शाळा राहाता तालुक्यातील आहेत, शिवाय संगमनेर २२, नेवासा ११ व पाथर्डीत ११ शाळा सुरू झाल्या आहेत. सर्वात कमी म्हणजे १ शाळा कर्जत तालुक्यात सुरू झाली आहे.

--------

सुरू झालेल्या तालुकानिहाय शाळा

अकोले ४६

संगमनेर २२

कोपरगाव ४

राहाता २४

राहुरी ५

श्रीरामपूर ३

नेवासा १४

शेवगाव ४

पाथर्डी ११

जामखेड २

कर्जत १

श्रीगोंदा ४

पारनेर २

नगर ७

------------