शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अर्सेनिकवर पदाधिकाऱ्यांची चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:53 IST

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे पाणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येऊनही यावर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ...

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे पाणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येऊनही यावर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप चुप्पीच साधलेली आहे. प्रशासनानेही तपासाच्या नावाखाली केवळ संबंधितांना गोळ्यांची पाकिटे बदलून दिली, मात्र निकृष्ट गोळ्यांचे पुढे काय झाले, याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची प्रतिकारशक्ती वाढावी, म्हणून प्रत्येकाला अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपाच्या सूचना शासनाने दिल्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने तब्बल सहा महिने उशिराने म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये या गोळ्या एजन्सी नेमून वाटपास सुरुवात केली. जिल्ह्यातील ३८ लाख ४२ हजार लोकांना या एजन्सीमार्फत गोळ्यांचा पुरवठा पंचायतसमिती स्तरावर करण्यात आला.

दरम्यान, मागील आठवड्यात शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे या गोळ्यांमध्ये पाणी आढळले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तातडीने या गोळ्या ताब्यात घेण्यासाठी धावपळ केली. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला दुसऱ्या गोळ्या बदलून दिल्या. दरम्यान, अशा निकृष्ट गोळ्यांचा पुरवठा करून जिल्हा परिषद सामान्य लोकांच्या जीवाशी खेळत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त झाल्या.

एवढा सगळा प्रकार होऊनही यावर जिल्हा परिषद पदाधिकारी मात्र गप्प आहेत. हा प्रकार कसा झाला, गोळ्यांचे पाणी झाले तर यात दोषी कोण? यात खरंच ठेकेदाराकडून निकृष्ट पुरवठा झालाय की, अन्य काही वैद्यकीय कारण आहे, यावर अद्याप कोणत्याही पदाधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रशासनाकडेही या प्रकारावरील पुढील कारवाईबाबत विचारणा केली असता, संबंधित गोळ्यांचे नमुने ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे, एवढेच उत्तर मिळाले. त्यामुळे या सर्व प्रकारावर गोलमाल कारभार सुरू असल्याचे दिसत आहे.