शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कामगार मंडळाकडे नोंदणीच नाही,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:20 IST

अहमदनगर : लॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने घरोघरी मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलांनाही आर्थिक मदत ...

अहमदनगर : लॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने घरोघरी मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलांनाही आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यात मात्र घरकाम करणाऱ्या ९० टक्के महिलांची घरेलू कामगार मंडळाकडे नोंदणीच नसल्याने शासनाची ही मदत आता त्यांना कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जिल्ह्यात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलांची पंधरा ते सोळा हजार इतकी संख्या आहे, असे जिल्हा श्रमिक व संघटित कामगार संघटनेकडील आकडेवारीवरून दिसते. घरेलू कामगार मंडळांतर्गत या महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. यासाठी दरवर्षी या मंडळाकडे विशिष्ट शुल्क भरून नोंदणी करावी लागते. बहुतांश महिलांना मात्र या योजनांबाबत काहीच माहिती नसल्याने त्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन काळात शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा या महिलांपर्यंत कसा लाभ मिळणार, असा प्रश्न आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरकाम करणाऱ्या महिलांची कामे बंद झाली असून कुटुंबाची उपजीविका कशी भागवावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. शासनाने आता नोंदणी करून घेऊन तत्काळ लाभ द्यावा, अशी मागणी या महिलांकडून होत आहे.

..........

असंघटित घटकांत मोडणाऱ्या कामगार महिलांची घरेलू कामगार मंडळाकडे नोंदणी केली जाते. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून नोंदणी बंद होती. घरकाम करणाऱ्या बहुतांशी महिलांना शासकीय योजनांबाबत माहिती नाही. या महिलांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ नोंदणी घेऊन त्यांना लाभ द्यावा, अशी मागणी केली जाणार आहे.

-विलास कराळे, अध्यक्ष जिल्हा श्रमिक व संघटित कामगार संघटना

.......

शासकीय योजनांबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे घरेलू कामगार मंडळाकडे माझ्यासह अनेक महिलांनी नोंदणी केलेली नाही. आता मात्र नोंदणी करणार आहोत. त्यामुळे शासनाने आम्हाला लाभ द्यावा.

-मनीषा वराडे, घरेलू कामगार

.........

कामगार मंडळाचे कार्यालय कुठे आहे हे आम्हाला माहीत नव्हते, नोंदणी कशी करावी, याचीही माहिती नव्हती त्यामुळे योजनांचा लाभ तरी कसा घेणार? पण शासनाने आमच्या परिस्थितीचा विचार करून आता आम्हाला लाभ द्यावा.

-रंजना वाघोळे, घरेलू कामगार

.......

२५० कोटींची तरतूद

राज्य शासनाने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात घरेलू कामगार महिलांसाठी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना जाहीर करत तब्बल २५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत कामगार महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनांची कामगार महिलांना मात्र माहिती नसल्याने त्या लाभापासून वंचित राहत असल्याची परिस्थिती आहे.