शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

जिल्हा परिषदेत अभ्यागतांना ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:21 IST

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता जिल्हा परिषदेमध्ये आता अभ्यागतांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. खूपच आवश्यक ...

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता जिल्हा परिषदेमध्ये आता अभ्यागतांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. खूपच आवश्यक काम असेल तरच प्रवेश, अन्यथा अभ्यागतांनी आपले कागदपत्र किंवा संदेश टपालात देण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे त्याचा संसर्ग जिल्हा परिषदेतही होऊ नये यामुळे प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गेल्या तीन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी जेव्हा जिल्हा परिषद उघडली तेव्हा तिचे तीनही गेट बंद होते. अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात येत होता. आवश्यक काम असेल तरच प्रवेश होता. त्यातही लोक समूहाने आले असतील तर त्यातील एकाला आत सोडले जात होते. इतर निवेदने किंवा कागदपत्रे असतील तर ते टपालात जमा करून घेतले जात होते.

जिल्ह्यातील अभ्यागतांनी जिल्हा परिषदेत येण्याचे शक्यतो टाळावे. शक्यतो फोनवर संबंधित विभागाशी संपर्क करून कामकाज उरकण्याचा प्रयत्न करावा. आवश्यक नसेल तर काही दिवस काम पुढे ढकलून कोरोना स्थिती आटोक्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेत यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

---------

फोटो - जिल्हा परिषद इमारत