शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ग्रामविकासमंत्र्यांनी घेतला निंबळकचा गृहपाठ

By admin | Updated: July 6, 2014 00:17 IST

अहमदनगर : किती वर्षापासून मीटर पद्धतीने पाणी देता? एस.टी. बस, रेल्वे बुकिंग सुविधा आहे का? किती नळ जोड आहेत? बँकिंग सुविधा आहे का? गावचे उत्पन्न किती? अशा एक ना अनेक प्रश्नांची

अहमदनगर : किती वर्षापासून मीटर पद्धतीने पाणी देता? एस.टी. बस, रेल्वे बुकिंग सुविधा आहे का? किती नळ जोड आहेत? बँकिंग सुविधा आहे का? गावचे उत्पन्न किती? अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी निंबळक (ता.नगर) ग्रामपंचायतीचा गृहपाठ घेतला. तसेच मीटर पध्दतीने पाणी देण्याचे कौतुक केले.निंबळक येथे महा ‘ई’ संग्राम योजनेमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधाचा आढावा घेण्यासाठी ग्रामपंचायतीचे कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी भेट दिली. यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जगन्नाथ भोर, कालिंदी लामखडे,माधवराव लामखडे, रवींद्र जगताप, अशोक पावडे, विलासराव लामखडे, अशोक पवार, घन:श्याम म्हस्के, उपस्थित होते.पाटील यांनी सरपंच लामखडे, ग्रामसेवक युवराज ढेरे, संगणक संचालिका रोहिणी रख यांची परीक्षाच घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली. गावात निवडणुका होतात का? किती प्रमाण आहे? मीटर पद्धतीचे पाणी लोकांना परवडते का? गावात किती झाडे लावली? असे प्रश्न विचारून सरपंच व ग्रामसेवकांचा त्यांनी गृहपाठ घेतला. यावेळी पाटील म्हणाले की, या गावात १६०० नळजोड असून, मीटर पद्धतीने पाणीपुरवठा करण्याची पद्धत पथदर्शक आहे.राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी हिच पद्धत वापरली तर महाराष्ट्र टँकरमुक्त होण्यास वेळ लागणार नाही. तसेच सर्व प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ गावातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोच केला हे कौतुकास्पद आहे असे उद्गारही पाटील यांनी काढले. आता या गावाने पर्यावरण समृद्धीकडे लक्ष देऊन गावाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा संकल्प करावा यासाठी जि.प.च्या वतीने सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले.काटेकोरपणे तसेच आदर्शपणे काम केल्यामुळे ही ग्रामपंचायत महाराष्ट्रात झळकत आहे. या ग्रामपंचायतीचा आदर्श इतर ग्रामपंचायतीने घेऊन सरकारी योजना आपल्या गावात आणल्या पाहिजे. सरकारी योजना भरपूर आहेत पण त्या राबविण्यासाठी काम करणारी माणसे नसतील तर त्या योजना कागदावरच राहतात. ग्रामपंचायतमधून मिळणाऱ्या सुविधाचा फलक लावल्यामुळे नागरिकांची चांगली सोय झाली. एकाच छत्राखाली २८ प्रकारच्या सुविधा देणारी ही पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, बाळासाहेब कड, बाळासाहेब गायकवाड, प्रदीप सावंत, राजू रोकडे, बबन कदम, संग्राम प्रकल्पाचे निलेश आडकर, हर्षल टाक, समीर पटेल यांच्यासह अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)