शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

राष्ट्रीय एकता मंच हिंसाचार विरोधी निर्धार मार्च

By admin | Updated: June 28, 2014 01:11 IST

खर्डा (जि. अहमदनगर) : राष्ट्रीय एकता मंच हिंसाचार विरोधी निर्धार मार्च खर्डा येथून निघून अहमदनगर मार्गे पुणे (हडपसर) येथे समारोप होणार आहे.

खर्डा (जि. अहमदनगर) : राष्ट्रीय एकता मंच हिंसाचार विरोधी निर्धार मार्च खर्डा येथून निघून अहमदनगर मार्गे पुणे (हडपसर) येथे समारोप होणार आहे. या हिंसाचार विरोधी निर्धार मार्चमध्ये मौलाना आझाद विचार मंच, महिला विकास केंद्र, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, युसुफ मेहरअली सेंटर, अखिल भारतीय खाटीक संघटना व संभाजी ब्रिगेड आदी विविध संघटनांनी सहभाग नोंदवला. यात यापुढे निरपराधांचा बळी जाऊ नये हा संदेश देण्यासाठी निर्धार मार्च आहे, असे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.खर्डा शासकीय विश्रामगृहावर निर्धार मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. विश्रामगृहावर झालेल्या सभेत खासदार हुसेन दलवाई, सामाजिक कार्यकर्त्या प्रा.सुशिला मोराळे, अर्चना सातपुते आदींसह मार्चमधील वक्त्यांची भाषणे झाले. प्रा.सुशिला मोराळे म्हणाल्या, माणूस नावाची जात मानतो, जात, धर्म,पंथ न मानता माणूस नावाची जात मानणारांपैकी आपण आहोत. माणसाने माणसाबरोबर माणसाप्रमाणे वागले पाहिजे. पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता नि:पक्षपाती तपास करून अन्याय झालेल्यांना न्याय कसा मिळेल याची दक्षता घेऊन सहकार्य करावे.खा.हुसेन दलवाई म्हणाले, हिंसाचार विरोधी निर्धार मार्च हा कुठल्या जातीधर्माच्या विरोधात नाही, जनतेला जागृत करून अन्याय कोणावर होणार नाही याची दक्षता घेऊन जनता जागृत होण्यासाठी निर्धार मार्च काढला आहे. शिवाजी महाराजांची विटंबना महाराष्ट्रातील मुस्लीम करणार नाही हे दुसरे कोणी तरीच केले. मुस्लिमांना खरा न्याय दिला व मानाने वागवले तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी वागवले. कायदा सुव्यवस्था काही प्रमाणात ढिसाळ झाल्याचे दिसून येते. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी, त्यांचा मुख्य सूत्रधार अजून अटक झालेले नाही. सिमी संघटनेच्या विरोधात कठोर निर्णय घेऊन बंदी आणली तसा निर्णय दुसऱ्या संघटनांवर कडक कार्यवाही करून घ्यावा. हिंसाचाराच्या विरोधात लढा उभा करून समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम होऊ नये, जनतेला क्रियाशील करण्यासाठी निर्धार मार्च काढला आहे.यापुढे निरपराधांचा बळी जाऊ नये हा संदेश देण्यासाठी निर्धार मार्च आहे. अन्यायग्रस्तांच्या आई-वडिलांना मुख्यमंत्री व गृहमंत्री यांची भेट घेऊन तपासाची योग्य दिशा द्यावी, असे निवेदन देण्याचे खा.हुसेन दलवाई यांनी सांगितले.(प्रतिनिधी)