शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्याचा आराखडा पंधरा दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 12:48 IST

जयकुमार रावल यांची किल्ल्याला भेट : चार प्रकल्पांचा प्रस्ताव करणार

अहमदनगर : ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे पर्यटनदृष्ट्या सुशोभिकरण व विकास करण्यासाठी संरक्षण खाते, राज्याचा पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रस्ताव तयार करावा. चार प्रकल्पांचा समावेश असलेला आराखडा पंधरा दिवसात सादर करण्याचा आदेश पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. साईशताब्दी आराखड्यात नगरच्या विकासालाही स्थान देण्याचे संकेत रावल यांनी दिले.पर्यटनमंत्री रावल यांनी रविवारी सकाळी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला भेट दिली. जोराचा पाऊस असुनही मंत्री रावल यांनी किल्ल्याची व नेत्यांच्या कक्षाची पाहणी केली. यावेळी खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे सीईओ विश्वजित माने, महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी आदींची उपस्थिती होती. अनंत देसाई, अभिजित लुणिया यांनीही किल्ल्याच्या सुशोभिकरणाची मागणी असलेले निवेदन मंत्री रावल यांना दिले. मंत्री रावल व खा. गांधी यांनी थेट केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. त्यावेळी लवकरच किल्ल्याची पाहणी करून केंद्राचा निधी उपलब्ध करून देव, असे भामरे यांनी आश्वासन दिल्याचे रावल यांनी सांगितले.यावेळी नेता कक्षात पत्रकारांशी बोलताना रावल म्हणाले, नगर जिल्ह्यात पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची मोठी संधी आहे. पर्यटनाला प्राधान्य देणारे मोदी सरकार पहिले सरकार आहे. इनक्रेडिबल इंडियाच्या धर्तीतर अनलिमिटेड महाराष्ट्र या संकल्पेवर आधारीत पर्यटन विकास करण्यात येत आहे. बर्फ सोडून जगातल्या सर्व गोष्टी महाराष्ट्रात आहेत. योगापासून ते आयुर्वेदापर्यंत सर्व वैद्यकीय थेरपींद्वारे एकाच छताखाली उपचार करणारे मेडिकल टुरिझम विकसित केले जाईल. ही केंद्र लोणावळ््याजवळ शिलिम आणि इगतपुरी येथे विकसित केले जाणार आहेत. परदेशातून येणारी ८० टक्के जहाज मुंबईला उतरतील, अशी रचना करण्यात येत असून त्याद्वारे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. शिर्डी-शिंगणापूर-त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी येणारे भाविक-पर्यटक नगरला येतील,यासाठी पहिल्या टप्प्यात किमान चार प्रस्ताव द्यावेत. साईशताब्दी महोत्सवांतर्गत परिसर विकासातून नगरच्या किल्ल्याच्या सुशोभिकरणालाही प्राधान्य दिले जाईल. महामार्गावर मदतकक्ष स्थापन करण्याचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. बस शेड, माहिती केंद्र, टॅक्सी व्यवस्था आदी बाबींचा या मदत कक्षांतर्गत समावेश असेल.------------