शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

किल्ल्याचा आराखडा पंधरा दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 12:48 IST

जयकुमार रावल यांची किल्ल्याला भेट : चार प्रकल्पांचा प्रस्ताव करणार

अहमदनगर : ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे पर्यटनदृष्ट्या सुशोभिकरण व विकास करण्यासाठी संरक्षण खाते, राज्याचा पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रस्ताव तयार करावा. चार प्रकल्पांचा समावेश असलेला आराखडा पंधरा दिवसात सादर करण्याचा आदेश पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. साईशताब्दी आराखड्यात नगरच्या विकासालाही स्थान देण्याचे संकेत रावल यांनी दिले.पर्यटनमंत्री रावल यांनी रविवारी सकाळी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला भेट दिली. जोराचा पाऊस असुनही मंत्री रावल यांनी किल्ल्याची व नेत्यांच्या कक्षाची पाहणी केली. यावेळी खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे सीईओ विश्वजित माने, महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी आदींची उपस्थिती होती. अनंत देसाई, अभिजित लुणिया यांनीही किल्ल्याच्या सुशोभिकरणाची मागणी असलेले निवेदन मंत्री रावल यांना दिले. मंत्री रावल व खा. गांधी यांनी थेट केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. त्यावेळी लवकरच किल्ल्याची पाहणी करून केंद्राचा निधी उपलब्ध करून देव, असे भामरे यांनी आश्वासन दिल्याचे रावल यांनी सांगितले.यावेळी नेता कक्षात पत्रकारांशी बोलताना रावल म्हणाले, नगर जिल्ह्यात पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची मोठी संधी आहे. पर्यटनाला प्राधान्य देणारे मोदी सरकार पहिले सरकार आहे. इनक्रेडिबल इंडियाच्या धर्तीतर अनलिमिटेड महाराष्ट्र या संकल्पेवर आधारीत पर्यटन विकास करण्यात येत आहे. बर्फ सोडून जगातल्या सर्व गोष्टी महाराष्ट्रात आहेत. योगापासून ते आयुर्वेदापर्यंत सर्व वैद्यकीय थेरपींद्वारे एकाच छताखाली उपचार करणारे मेडिकल टुरिझम विकसित केले जाईल. ही केंद्र लोणावळ््याजवळ शिलिम आणि इगतपुरी येथे विकसित केले जाणार आहेत. परदेशातून येणारी ८० टक्के जहाज मुंबईला उतरतील, अशी रचना करण्यात येत असून त्याद्वारे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. शिर्डी-शिंगणापूर-त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी येणारे भाविक-पर्यटक नगरला येतील,यासाठी पहिल्या टप्प्यात किमान चार प्रस्ताव द्यावेत. साईशताब्दी महोत्सवांतर्गत परिसर विकासातून नगरच्या किल्ल्याच्या सुशोभिकरणालाही प्राधान्य दिले जाईल. महामार्गावर मदतकक्ष स्थापन करण्याचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. बस शेड, माहिती केंद्र, टॅक्सी व्यवस्था आदी बाबींचा या मदत कक्षांतर्गत समावेश असेल.------------