शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नगर-दौंड रस्ता, साकळाई पाणी योजना वर्षानुवर्षे प्रलंबित

By admin | Updated: August 19, 2014 23:32 IST

श्रीगोंदा : कुकडी घोडचे पाटपाणी आणि साखर कारखानदारीमुळे दुष्काळग्रस्त तालुक्याचे चित्र बदलले आहे.

श्रीगोंदा : कुकडी घोडचे पाटपाणी आणि साखर कारखानदारीमुळे दुष्काळग्रस्त तालुक्याचे चित्र बदलले आहे. श्रीगोंद्याचे १२ टक्के सिंचन असलेले क्षेत्र ७० टक्क्यांच्या वर गेले. मात्र एम. आय. डी. सी. प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रोजगार व व्यवसायाला चालना मिळाली नाही. साकळाईचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. कोळगाव, मांडवगण, गुणवडीचा पठारी भाग विकासापासून उपेक्षित राहिला आहे.श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात नगर जिल्ह्यातील वाळकी व चिचोंडी पाटील हे गट समाविष्ट आहेत. श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी प्रतिष्ठा पणाला लावून रस्ते, बंधारे, सभामंडप आदी कामासाठी कोट्यवधीचा निधी आणला. परंतु ठेकेदारांनी निकृष्ट कामे करून निधीची लयलूट केली. विकास कामापेक्षा कामात झालेला भ्रष्टाचार यावर चर्चेची गुऱ्हाळे रंगली.कुकडी प्रकल्पात डिंबे-माणिकडोह बोगदा व डिंबे-येडगाव कालवा विस्तारीकरण यावर घोषणा झाल्या. पुणेकरांनी पाणी प्रश्नाबाबत आडमुठे राजकारण केले. यावर लोकप्रतिनिधींनी त्यांना पाहिजे त्यावेळी धारेवर धरले नाही. घोडची उंची वाढविण्यावर चर्चा झाली. पाणी प्रश्नांवरील जखमांच्या वेदना कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सहन कराव्या लागल्या आहेत.कोळगाव व गुणवडी, मांडवगण परिसरातील ३६ गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई योजनेवर ठोस कार्यवाही झाली नाही. श्रीगोंदा व काष्टीला भेडसावणारा पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आ. बबनराव पाचपुतेंनी घोड धरणावरून नळपाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली कामाचा नारळ फोडला. नगर-दौंड रस्त्याचा प्रश्न गेल्या तीन वर्षापासून चर्चेत आहे. तांत्रिक अडचणीमुळे शासन पैसे देत नाही आणि ठेकेदाराला निविदा परवडत नाही. भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी या प्रश्नावर आ. पाचपुते यांना कोंडीत धरले. परंतु खा. गांधी यांनीही कोणतीच कृती केली नाही. खा. गांधी यांनी या प्रश्नात लक्ष घालून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. या रस्त्याचा प्रश्नमार्गी लागला तर या भागाच्या विकासाला चालना मिळेल. १९८० पासून गाजत असलेल्या एम. आय. डी. सी. ने औटीवाडी, कोळगाव फाटा, वाळकी असा प्रवास केला आहे. मात्र एम. आय. डी. सी. च्या घोषणा हवेतच विरल्या गेल्या आहेत.श्रीगोंदा तालुक्यातील ४८ गावातील सुमारे ५ हजार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर माळढोक पक्षी अभयारण्य जमीन आरक्षणाचे भूत बसले आहे. ते भूत कधी हटणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.विधानसभा निवडणुकीत सत्तेचा सारीपाट जिंकण्यासाठी सर्वच नेत्यांनी तत्व, निष्ठा गुंडाळून ठेवत मिळेल तो झेंडा हातात घेऊन मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. हे नेते विकास व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी भूमिका घेणार का हाच प्रश्न आहे. (प्रतिनिधी)