शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला त्रयस्थ संस्थेचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST

अहमदनगर : विकासकामांच्या त्रयस्थ संस्थेकडून केल्या जाणाऱ्या तपासणीला बगल देण्याचा घाट महापालिकेने घातला असून, गेल्या दोन महिन्यात एकाही कामाची ...

अहमदनगर : विकासकामांच्या त्रयस्थ संस्थेकडून केल्या जाणाऱ्या तपासणीला बगल देण्याचा घाट महापालिकेने घातला असून, गेल्या दोन महिन्यात एकाही कामाची तपासणी केली गेली नाही. त्यामुळे महापालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या विकासकामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सन २०१८-१९मध्ये शासकीय निधीतील विकासकामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये ५० लाखांपेक्षा जास्त रकमेची जी कामे आहेत, अशा कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाते. यापेक्षा कमी रकमेच्या कामांचीही त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यात एकाही कामाची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली गेली नाही. अशा कामांची बिले अदा करताना १० टक्के रक्कम राखीव ठेवून उर्वरित रक्कम ठेकेदारांना अदा केली गेली. हा मुद्दा नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. यावेळी शासनाच्या आदेशावर चर्चा झाली, परंतु ठोस निर्णय झाला नाही. कामाच्या देखभाल व दुरुस्तीची मुदत दोन वर्षे असते. ही मुदत संपल्यानंतर त्रयस्थ संस्थेने तपासणी केल्यास त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी पालिकेची की ठेकेदाराची हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

.............

प्रस्ताव पाठवूनही तपासणी नाही

त्रयस्थ संस्था म्हणून शासनाने पुणे व औरंगाबाद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाची नेमणूक केली आहे. परंतु, या संस्थांना प्रस्ताव पाठवूनही ते तपासणीसाठी येत नाहीत. त्यामुळे १० टक्के रक्कम म्हणजे नफ्याची रक्कम महापालिकेत अडकून पडते, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे. जोपर्यंत त्रयस्थ संस्थेकडून तपासणी होत नाही, तोपर्यंत १० टक्के रक्कम मिळणार नाही, अशी महापालिकेची भूमिका आहे.

....

तपासणीबाबत संभ्रम

महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या ५ लाखांपर्यंतच्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याबाबत ठोस निर्णय नाही. त्यामुळे या कामांची तपासणी करावी किंवा नाही, याबाबतही प्रशासकीय पातळीवर संभ्रम आहे.

....

इतर महापालिकांकडून मागवली माहिती

विकासकामांच्या त्रयस्थ संस्थेमार्फत केल्या जाणाऱ्या तपासणीबाबत इतर महापालिकांनी काय कार्यवाही केली, याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. धुळे महापालिकेत सर्वच विकासकामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.