शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

महावितरणची सावकारी पद्धतीने वसुली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:14 IST

संगमनेर : महावितरण कंपनीने सर्व नियम धाब्यावर बसवून सावकारी पद्धतीने वसुली सुरू केली आहे. विद्युत अधिनियम २००३ नुसार कोणत्याही ...

संगमनेर : महावितरण कंपनीने सर्व नियम धाब्यावर बसवून सावकारी पद्धतीने वसुली सुरू केली आहे. विद्युत अधिनियम २००३ नुसार कोणत्याही थकबाकीदार ग्राहकाची वीजजोडणी खंडित करण्यापूर्वी त्याला १५ दिवस नोटीस देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, असे होत नसून महावितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. हे न थांबल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे, असे भाजपच्या किसान मोर्चाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे यांनी सांगितले.

कानवडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणाचीही वीजजोडणी खंडित होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांची वीजजोडणी खंडित करण्यात येणार आहे, असे सांगितले. याचा अर्थ महाविकास आघाडी सरकार शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातील १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्यात येईल. अधिक बिल आलेल्या ग्राहकांना ते कमी करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले; परंतु असे काहीही झाले नाही.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते, तेलंगाणा सारखे राज्य शेतकऱ्यांना माेफत व २४ तास वीज देते, तर आपण का देऊ शकत नाही? आता सरकार त्यांचेच असून त्यांनी शेतकऱ्यांना मोफत व २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी, नागरिकांना वाढीव वीज बिल देऊन वीजजोडणी खंडित करण्यात येत आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.