शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
3
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
4
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
5
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
6
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
7
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
8
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
9
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
10
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
11
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
13
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
14
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
15
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
16
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
17
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
18
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
19
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
20
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित

खासदार झाले शहराचे अध्यक्ष!

By admin | Updated: March 31, 2016 00:03 IST

अहमदनगर : तीन महिन्यांपासून रखडलेल्या भाजपा शहराध्यक्षपदाच्या नावाची अखेर बुधवारी घोषणा झाली.

अहमदनगर : तीन महिन्यांपासून रखडलेल्या भाजपा शहराध्यक्षपदाच्या नावाची अखेर बुधवारी घोषणा झाली. नगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांची शहर जिल्हाध्यक्षपदी (महानगर) वर्णी लागली आहे. या पदाचे दावेदार अ‍ॅड. अभय आगरकर यांना डावलण्याच्या प्रयत्नात खासदार गांधीच शहर जिल्हाध्यक्ष झाल्याने पक्षीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त झाले आहे.भाजपामध्ये अंतर्गत पदाधिकारी निवड प्रक्रिया तीन महिन्यांपासून राबविण्यात येत होती. प्रदेशाध्यक्ष जाहीर झाल्यानंतर जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्याचे अधिकार प्रदेशाध्यक्षांनाच आहेत. त्याप्रमाणे कोअर कमिटीने सूचविलेल्या नावांचाच विचार प्रदेशाध्यक्षांकडून केला जातो. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रा. भानुदास बेरड यांची गेल्या महिन्यात नियुक्ती झाली. त्यानंतर शहर जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सीखेच लागली होती. विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांच्यासह डझनभर आजी-माजी पदाधिकाऱ्यांची नावे शहर जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चेत होती. आगरकर-गांधी यांच्या गटामध्ये पदासाठी जोरदार रस्सीखेच होती. या स्पर्धेत खासदार गांधी यांचे कुठेही नाव नव्हते. त्यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली. त्यामध्ये नगरच्या अध्यक्षपदी गांधी यांचे नाव जाहीर झाले आणि गांधी विरोधकांच्या भुवया उंचावल्या. खासदार गांधी यांनी प्रदेशाध्यक्षांकडे सुवेंद्र गांधी किंवा स्वत:लाच अध्यक्षपद द्यावे अशी आग्रही मागणी लावून धरली होती, अशी माहिती आहे. खासदार गांधी हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यात नगर दक्षिणेचे खासदार आहेत. केंद्र सरकारच्या अनेक समित्यांवर ते कार्यरत आहेत.तसेच काही काळ ते भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष होते, असे असताना गांधी यांच्या पदरात शहर अध्यक्षपद देवून पक्षाने काय साधले? गांधी हे अध्यक्ष झाले म्हणजे एखादा मंत्री सरपंच झाल्यासारखे आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. दरम्यान अ‍ॅड. अभय आगरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी मी कधीही इच्छा व्यक्त केली नव्हती, तसेच या स्पर्धेतही उतरलो नव्हतो.(प्रतिनिधी)शहर जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेत मी कधीही नव्हतो. या पदासाठी मी कोणतीही शिफारस केली नव्हती. मी अध्यक्ष व्हावे, असे प्रदेशाध्यक्षांना वाटले असेल तर त्यात गैर काय? पक्ष संघटनेमध्ये पदापेक्षा काम करणे महत्त्वाचे आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपविली आहे. कोणतीही जबाबदारी ही लहान-मोठी असत नाही. पदापेक्षा कामालाच महत्त्व देत आलो आहे. त्यामुळे या पदालाही न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू. -दिलीप गांधी, खासदार