शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

बहुतांशी संचालकांकडून मुदतवाढीची मागणी

By admin | Updated: August 12, 2014 23:18 IST

बहुतांशी संचालकांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत वाढवून मागितली आहे. जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी २ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.

अहमदनगर : गत महिन्यात अर्बन को-आॅपरेटिव्ह मल्टिस्टेट बँकेच्या आर्थिक नुकसानीबाबत बँकेचे विद्यमान अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्यासह आजी-माजी संचालकांसह ५७ जणांवर जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, बहुतांशी संचालकांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत वाढवून मागितली आहे. जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी २ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. अर्बन बँकेच्या २००९-१० व २०१०-११ च्या लेखापरीक्षण अहवालात नोंदविलेल्या आक्षेपावरून सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. हौसारे यांच्याकडे चौकशीचे काम सोपविण्यात आले. त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे कलम ८८ नुसार संबंधित आजी-माजी संचालकांवर आरोप निश्चिती करण्याचा निर्णय घेतला. बँकेच्या पुणे शाखेत बनावट कागदपत्रे सादर करून ७ गाड्यांच्या खरेदीसाठी सुमारे ८० लाख रुपयांचे कर्ज वितरीत झाले. एकूण ९८ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. काष्टी शाखेतील सोने तारणात झालेला २३ लाख २८ हजारांचा अपहार, स्वस्तिक अ‍ॅक्सेसरीज कंपनीला नियमबाह्य व्याज सवलत दिल्याने झालेले २४ लाख ६० हजारांचे नुकसान, ९८ जणांच्या बेकायदा नोकरभरतीमुळे झालेले ९८ लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान आदी मुद्द्यांवरून संचालकांवर ठपका ठेवण्यात आला आहे. ५७ आजी-माजी संचालकांनी काल म्हणणे मांडले. यात लता लोढा यांच्यावतीने वसंत लोढा यांनी म्हणणे मांडतांना बँकेकडून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने १५ दिवसांची मुदत वाढ मिळावी, पी.जी. पाचरणे, विद्यमान संचालक शैलेश मुनोत यांनी त्यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाला, अतुल भंडारी आणि अन्य आठ संचालकांनी, पोपट गंगावणे यांनी बँकेकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची नोटीस मिळाली नसल्याचे म्हणणे मांडले. यामुळे या सर्वांना २ सप्टेंबरपर्यंत म्हणणे मांडण्यास मुदत देण्यात आली आहे. या आजी-माजी पदाधिकारी, संचालकांनी पुढील सुनावणीपर्यंत म्हणणे न मांडल्यास त्यांचे काहीही म्हणणे नाही, असे ग्राह्य धरून त्यांच्यावर कारवाई जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचे हौसारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पोलीस अधीक्षकांना नोटीसनगर अर्बन बँकेत २००८ पासून गैरप्रकार होत आहेत. असे असताना सीआयडीसारख्या सक्षम यंत्रणेमार्फत गैरप्रकाराची चौकशी का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस औरंगाबाद खंडपीठाने पोलीस अधीक्षकांसह सहकार खात्याचे सचिव, गृह सचिव, कोतवाली पोलीस ठाणे यांना बजावली आहे. या संदर्भात पुढील सुनावणी ५ सप्टेंबरला होणार आहे. बँकेच्या गैरप्रकारासंदर्भात बँकेचे सभासद विनोद गांधी यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती पी.आर. बोरा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी (दि.१२) सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने याचिकाकर्त्याचे म्हणणे समजावून घेतले. यावेळी खंडपीठाने नोटिसा बजावून प्रतिवादींचे म्हणणे मागवून घेतले आहे.राजेंद्र गांधी, योगेश कुलकर्णी यांनी एस.जी. शिंदे, संजय काशिद, नवीन गांधी, पुष्पा बाबर यांच्या वतीने, सुधीर खरे, पी.डी कुलकर्णी, अमृतलाल गट्टाणी, संजय छल्लारे, दिलीप ब्रम्हे यांनी आपले लेखी म्हणणे उपनिबंधक यांच्याकडे सादर केले आहे. उपनिबंधक यांनी ते दाखल करून घेतले आहे.