शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

राहुरीत बंद पाळून तहसीलवर मोर्चा : तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:31 IST

संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने ५ मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राहुरीत चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.

राहुरी : संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने ५ मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राहुरीत चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. समितीच्या वतीने तहसीलदार फसेउद्दीन शेख यांना निवेदन देण्यात आले.संविधान विरोधी दहा टक्के आर्थिक आधारावर दिलेले आरक्षण, विद्यापीठात तेरा पॉइंट रोस्टर प्रणाली लागू करुन संविधानिक हक्क नष्ट करणे, ईव्हीएम मशीनला लावण्यात आलेल्या पेपर ट्रेल मशीनमधील चिठ्ठी गिनती न करणे हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उलंघन आहे. जातीनिहाय जनगनणा करुन शंभर टक्के आरक्षण लागू करा. अकरा लाख आदिवासींचे शासनाने केलेले विस्थापन आदी मुद्यांना विरोध करण्यासाठी ५ मार्च रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती. याप्रसंगी संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी सकाळी राहुरी बस स्थानक येथून शहरात फेरी काढून बंदचे आवाहन करण्यात आले. नंतर रॅली तहसील कार्यालय येथे आली असता सभेत रुपांतर झाले. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून भाजप सरकार सत्तेवर येत आहे, असे प्रतिपादन यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी केले. याप्रसंगी प्रशांत शिंदे, कांतीलाल जगधने, विजय तमनर, अरुण डोंगरे, मच्छिंद्र गुंड, संजय संसारे, बाळासाहेब जाधव आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी निलेश जगधने, संदीप कोकाटे, सचिन पवार, राजू खोजे, राजा भोरे, रमेश गायकवाड, अतुल पवार, राजेश पवार, अमर सातुरे, सुनील तनपुरे, अशोक तुपे, फिरोज शेख, मच्छिंद्र गुलदगड, अब्दुलभाई आतार, निसारमामु पिंजारी, विजय अडांगळे, गणेश पवार, चंद्रकांत जाधव, युवराज पारडे उपस्थित होते.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर