शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

चिचुंद्रीमुळे घडले प्रामाणिकपणाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:28 IST

अहमदनगर : कारमध्ये घुसलेली चिचुंद्री काढण्यासाठी रस्त्यावरच कार थांबवून त्यातील बाहेर काढलेल्या बॅगा तशाच रस्त्यावर विसरल्याचे विवाहस्थळी गेल्यानंतर लक्षात ...

अहमदनगर : कारमध्ये घुसलेली चिचुंद्री काढण्यासाठी रस्त्यावरच कार थांबवून त्यातील बाहेर काढलेल्या बॅगा तशाच रस्त्यावर विसरल्याचे विवाहस्थळी गेल्यानंतर लक्षात आले. मात्र, दोन तासानंतरही त्या बॅगा तशाच जपून ठेवत परत मिळाल्याने औरंगाबाद येथील उद्योजक गोरक्षनाथ वायभासे यांना प्रामाणिकपणाचा अनोखा अनुभव मिळाला. माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

मूळचे घाटप्रिंपी (ता. आष्टी, जि. बीड) येथील उद्योजक गोरक्षनाथ तुकाराम वायभासे हे एका लग्नासाठी करंजीमार्गे औरंगाबाद रोडवरील घोडेगाव येथे निघाले होते. रस्त्यात देवराईजवळ आल्यानंतर त्यांच्या गाडीत एक चिचुंद्री आढळून आली. तिला बाहेर काढण्यासाठी त्यांनी रस्त्यातच गाडी थांबविली. चिचुंद्रीला बाहेर काढता यावे, यासाठी त्यांनी कारमधील बॅगा रस्त्यावर काढून ठेवल्या. त्यानंतर चिचुंद्रीला बाहेर काढले आणि बॅगा रस्त्यावरच विसरून ते सहकुटुंब घोडेगावला पोहोचले. मंगल कार्यालयात गेल्यानंतर बॅगा विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी ते पुन्हा माघारी फिरले. यावेळी तेथील गणेश भास्कर अकोलकर व हरिभाऊ संभादी अकोलकर यांनी बॅगा संभाळून ठेवत वायभासे यांची प्रतीक्षा करीत उभेच होते. बॅगा पाहून वायभासे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

मात्र बॅगा कोणाच्या आहेत, त्यामध्ये नक्की काय आहे, याबाबत काही विपरीत घडायला नको म्हणून अकोलकर यांनी पाथर्डी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले होते. याबाबत कोणाची काही तक्रार नसल्याने पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कायंदे यांनी वायभासे यांना बॅगा परत केल्या. या बॅगेत सर्व वस्तू जशाच्या तशा मिळाल्याने वायभासे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अकोलकर यांच्यासारखे प्रामाणिक माणसे असतील तर सर्वच सुरक्षित राहतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

---

फोटो- २८ वायभासे

रस्त्यावर विसरलेल्या बॅगा सहायक पोलीस निरीक्षक कायंदे यांनी गोरक्षनाथ वायभासे यांना प्रदान केल्या. समवेत गणेश व हरिभाऊ अकोलकर.