शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

चिचुंद्रीमुळे घडले प्रामाणिकपणाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:28 IST

अहमदनगर : कारमध्ये घुसलेली चिचुंद्री काढण्यासाठी रस्त्यावरच कार थांबवून त्यातील बाहेर काढलेल्या बॅगा तशाच रस्त्यावर विसरल्याचे विवाहस्थळी गेल्यानंतर लक्षात ...

अहमदनगर : कारमध्ये घुसलेली चिचुंद्री काढण्यासाठी रस्त्यावरच कार थांबवून त्यातील बाहेर काढलेल्या बॅगा तशाच रस्त्यावर विसरल्याचे विवाहस्थळी गेल्यानंतर लक्षात आले. मात्र, दोन तासानंतरही त्या बॅगा तशाच जपून ठेवत परत मिळाल्याने औरंगाबाद येथील उद्योजक गोरक्षनाथ वायभासे यांना प्रामाणिकपणाचा अनोखा अनुभव मिळाला. माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

मूळचे घाटप्रिंपी (ता. आष्टी, जि. बीड) येथील उद्योजक गोरक्षनाथ तुकाराम वायभासे हे एका लग्नासाठी करंजीमार्गे औरंगाबाद रोडवरील घोडेगाव येथे निघाले होते. रस्त्यात देवराईजवळ आल्यानंतर त्यांच्या गाडीत एक चिचुंद्री आढळून आली. तिला बाहेर काढण्यासाठी त्यांनी रस्त्यातच गाडी थांबविली. चिचुंद्रीला बाहेर काढता यावे, यासाठी त्यांनी कारमधील बॅगा रस्त्यावर काढून ठेवल्या. त्यानंतर चिचुंद्रीला बाहेर काढले आणि बॅगा रस्त्यावरच विसरून ते सहकुटुंब घोडेगावला पोहोचले. मंगल कार्यालयात गेल्यानंतर बॅगा विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी ते पुन्हा माघारी फिरले. यावेळी तेथील गणेश भास्कर अकोलकर व हरिभाऊ संभादी अकोलकर यांनी बॅगा संभाळून ठेवत वायभासे यांची प्रतीक्षा करीत उभेच होते. बॅगा पाहून वायभासे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

मात्र बॅगा कोणाच्या आहेत, त्यामध्ये नक्की काय आहे, याबाबत काही विपरीत घडायला नको म्हणून अकोलकर यांनी पाथर्डी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले होते. याबाबत कोणाची काही तक्रार नसल्याने पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कायंदे यांनी वायभासे यांना बॅगा परत केल्या. या बॅगेत सर्व वस्तू जशाच्या तशा मिळाल्याने वायभासे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अकोलकर यांच्यासारखे प्रामाणिक माणसे असतील तर सर्वच सुरक्षित राहतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

---

फोटो- २८ वायभासे

रस्त्यावर विसरलेल्या बॅगा सहायक पोलीस निरीक्षक कायंदे यांनी गोरक्षनाथ वायभासे यांना प्रदान केल्या. समवेत गणेश व हरिभाऊ अकोलकर.