शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

मोदींचे अण्णांना निमंत्रण नाही

By admin | Updated: May 24, 2014 00:41 IST

सुधीर लंके, अहमदनगर ‘सार्क’ देशांच्या प्रमुखांसह एकूण तीन हजार मान्यवरांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

सुधीर लंके, अहमदनगर ‘सार्क’ देशांच्या प्रमुखांसह एकूण तीन हजार मान्यवरांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पण या मान्यवरांच्या यादीत अण्णा हजारे यांचा मात्र मोदींनी समावेश केलेला दिसत नाही. कारण आज सायंकाळपर्यंत अण्णांना या सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले नाही. नरेंद्र मोदी २६ मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी देशविदेशातील मान्यवरांना निमंत्रणे गेली आहेत. शांती व भाईचारा वाढविण्याच्या उद्देशाने आपली पूर्वीची आक्रमक भूमिका मवाळ करत मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजेपक्षे यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे. या दोन निमंत्रणांवरुन वादविवादही सुरु झाले आहेत. देशातून गानसम्राज्ञी लता मंगेशकर,अमिताभ बच्चन, सलमान खान, रजनीकांत यांसारख्या अनेक मान्यवरांना सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. पण या सर्व यादीत गांधीवादी नेते अण्णा हजारे यांचा मात्र समावेश दिसत नाही. हजारे यांनी २०११ साली राजधानी दिल्लीसह देशभर भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला जनलोकपाल कायदा मंजूर करण्याचे धोरण घ्यावे लागले. या कायद्यासाठी संसदेवर विशेष अधिवेशन बोलविण्याची वेळ आली. अण्णांच्या या अहिंसक आंदोलनाची त्यावेळी जगभर दखल घेतली गेली. अनेक देशांनी त्यांना सन्मानाने निमंत्रित केले. अण्णांच्या आंदोलनातून देशभर भ्रष्टाचाराविरोधात जी लाट तयार झाली त्या लाटेवर स्वार होऊनच मोदींनी दिल्ली काबीज केली असेही मानले जाते. मात्र जगभरातील मान्यवरांना निमंत्रित करताना मोदी सरकारला अण्णांचा विसर पडला याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. अण्णांना केंद्र सरकारने पद्मश्री व पद्मभूषण किताब देऊनही गौरविलेले आहे. त्यामुळेही अण्णांना निमंत्रण येणे अपेक्षित होते. पण अद्याप असे निमंत्रण आलेले नाही. अण्णांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता अद्यापपर्यंत या सोहळ्याचे निमंत्रण आलेले नसल्याचे त्यांचे स्वीय सहाय्यक दत्ता आवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत अण्णांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. अण्णा हे ‘असली आझादी’ अभियानासाठी शनिवारी बंगलोरला जात आहेत. त्यांचा नियोजित दौरा ठरला असल्यामुळे आता निमंत्रण मिळाले तरी ते सोहळ्याला ऐनवेळी जाणार की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.