शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावरून मोदी सरकारने समाजात भांडणे लावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

अहमदनगर येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना कोळसे पाटील म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला सत्तेत सहभागी होण्यासाठी संविधानाने अधिकार दिला आहे. ...

अहमदनगर येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना कोळसे पाटील म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला सत्तेत सहभागी होण्यासाठी संविधानाने अधिकार दिला आहे. सध्या १५ टक्के लोकांनाच ५० टक्के आरक्षणाचा लाभ मिळतो. ८५ टक्के लोकांना सत्तेतील आरक्षण अजूनही मिळालेले नाही. केंद्र सरकार, राज्य सरकारमधील निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या कोअर ग्रुपमध्ये या ८५ टक्के समाजातील एकाही व्यक्तीला आजपर्यंत नोकरी मिळालेली नाही. एकीकडे सरकारमधील लाखो जागा रिकाम्या आहेत. दुसरीकडे सार्वजनिक प्रकल्पांच्या खासगीकरणाचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे आरक्षण देऊन कोणाला लाभ मिळणार आहे? असा सवालही कोळसे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, देशातील ८५ टक्के लोकांना देशाच्या कारभारात आजही सहभाग घेता येत नाही. मराठ्यांना आरक्षण देण्याचा तत्कालीन राज्य सरकारने केलेला कायदा म्हणजे मराठ्यांची फसवणूक असल्याचे आपण पूर्वीच सांगितले होते. आज आरक्षण मागण्याऐवजी देशाच्या मालकीची संपत्ती विकता येणार नाही, अशी मागणी समाजातून पुढे यावी. स्पर्धा परीक्षांमधून केवळ ०.००११ टक्के उमेदवारांनाच नोकरी मिळाली. त्यात आरक्षण द्यायचे झाले तर त्याचा काय उपयोग होणार, असा सवालही कोळसे यांनी केला.

मराठा आणि मराठेत्तर यांच्यात कोणी भांडणे लावली, असा पत्रकारांनी सवाल केला असता कोळसे यांनी थेट आरोप टाळला; मात्र ज्यांनी बाबरी, गोध्रा, उरी, पठाणकोट, घडवले, ज्याचा त्यांना फायदा झाला, त्यांनीच ही भांडणे लावली, असे सांगत अप्रत्यक्ष केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला.