शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावरून मोदी सरकारने समाजात भांडणे लावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

अहमदनगर येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना कोळसे पाटील म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला सत्तेत सहभागी होण्यासाठी संविधानाने अधिकार दिला आहे. ...

अहमदनगर येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना कोळसे पाटील म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला सत्तेत सहभागी होण्यासाठी संविधानाने अधिकार दिला आहे. सध्या १५ टक्के लोकांनाच ५० टक्के आरक्षणाचा लाभ मिळतो. ८५ टक्के लोकांना सत्तेतील आरक्षण अजूनही मिळालेले नाही. केंद्र सरकार, राज्य सरकारमधील निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या कोअर ग्रुपमध्ये या ८५ टक्के समाजातील एकाही व्यक्तीला आजपर्यंत नोकरी मिळालेली नाही. एकीकडे सरकारमधील लाखो जागा रिकाम्या आहेत. दुसरीकडे सार्वजनिक प्रकल्पांच्या खासगीकरणाचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे आरक्षण देऊन कोणाला लाभ मिळणार आहे? असा सवालही कोळसे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, देशातील ८५ टक्के लोकांना देशाच्या कारभारात आजही सहभाग घेता येत नाही. मराठ्यांना आरक्षण देण्याचा तत्कालीन राज्य सरकारने केलेला कायदा म्हणजे मराठ्यांची फसवणूक असल्याचे आपण पूर्वीच सांगितले होते. आज आरक्षण मागण्याऐवजी देशाच्या मालकीची संपत्ती विकता येणार नाही, अशी मागणी समाजातून पुढे यावी. स्पर्धा परीक्षांमधून केवळ ०.००११ टक्के उमेदवारांनाच नोकरी मिळाली. त्यात आरक्षण द्यायचे झाले तर त्याचा काय उपयोग होणार, असा सवालही कोळसे यांनी केला.

मराठा आणि मराठेत्तर यांच्यात कोणी भांडणे लावली, असा पत्रकारांनी सवाल केला असता कोळसे यांनी थेट आरोप टाळला; मात्र ज्यांनी बाबरी, गोध्रा, उरी, पठाणकोट, घडवले, ज्याचा त्यांना फायदा झाला, त्यांनीच ही भांडणे लावली, असे सांगत अप्रत्यक्ष केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला.