शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

आरक्षणावरून मोदी सरकारने समाजात भांडणे लावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

अहमदनगर येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना कोळसे पाटील म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला सत्तेत सहभागी होण्यासाठी संविधानाने अधिकार दिला आहे. ...

अहमदनगर येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना कोळसे पाटील म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला सत्तेत सहभागी होण्यासाठी संविधानाने अधिकार दिला आहे. सध्या १५ टक्के लोकांनाच ५० टक्के आरक्षणाचा लाभ मिळतो. ८५ टक्के लोकांना सत्तेतील आरक्षण अजूनही मिळालेले नाही. केंद्र सरकार, राज्य सरकारमधील निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या कोअर ग्रुपमध्ये या ८५ टक्के समाजातील एकाही व्यक्तीला आजपर्यंत नोकरी मिळालेली नाही. एकीकडे सरकारमधील लाखो जागा रिकाम्या आहेत. दुसरीकडे सार्वजनिक प्रकल्पांच्या खासगीकरणाचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे आरक्षण देऊन कोणाला लाभ मिळणार आहे? असा सवालही कोळसे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, देशातील ८५ टक्के लोकांना देशाच्या कारभारात आजही सहभाग घेता येत नाही. मराठ्यांना आरक्षण देण्याचा तत्कालीन राज्य सरकारने केलेला कायदा म्हणजे मराठ्यांची फसवणूक असल्याचे आपण पूर्वीच सांगितले होते. आज आरक्षण मागण्याऐवजी देशाच्या मालकीची संपत्ती विकता येणार नाही, अशी मागणी समाजातून पुढे यावी. स्पर्धा परीक्षांमधून केवळ ०.००११ टक्के उमेदवारांनाच नोकरी मिळाली. त्यात आरक्षण द्यायचे झाले तर त्याचा काय उपयोग होणार, असा सवालही कोळसे यांनी केला.

मराठा आणि मराठेत्तर यांच्यात कोणी भांडणे लावली, असा पत्रकारांनी सवाल केला असता कोळसे यांनी थेट आरोप टाळला; मात्र ज्यांनी बाबरी, गोध्रा, उरी, पठाणकोट, घडवले, ज्याचा त्यांना फायदा झाला, त्यांनीच ही भांडणे लावली, असे सांगत अप्रत्यक्ष केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला.