शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आमदार, नगराध्यक्ष बसले उपोषणाला : श्रीरामपूर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:03 IST

श्रीरामपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून, दुष्काळाच्या सवलती तातडीने सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले.

अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून, दुष्काळाच्या सवलती तातडीने सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. यामध्ये आमदार भाऊसाहेब कांबळे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सभापती दीपकराव पटारे, शरद नवले, संगीता गांगुर्डे, कल्याणी कानडे, वैशाली मोरे, गिरीधर आसने, गणेश मुद्गुले, रामभाऊ लीपटे, भाऊसाहेब बांद्रे, राधाकृष्ण आहेर, संतोष कानडे, संजय बाहुले, रज्जाक पठाण, संचित गिरमे, नितीन थोरात, शिवाजी शेजूळ, संदीप शेलार, अनिल थोरात, कलीम कुरेशी, राजेश अलघ, रवींद्र गुलाटी, शामलिंग शिंदे, अंजुमभाई शेख आदिंसह पदाधिकारी सहभागी झाले.श्रीरामपूर तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झालेला असून, सध्या पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. शेती व्यवसाय प्रचंड अडचणीत आलेला आहे. श्रीरामपूर महसूल अंतर्गत चार महसूल मंडळे आहेत. यापैकी बेलापूर महसूल मंडळात शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे. बेलापूर महसूल मंडळापेक्षा गंभीर परिस्थिती इतर तिन्ही महसूल मंडळात असतानाही ते दुष्काळाच्या सवलतीपासून अद्यापर्यंत वंचित आहे. या तिन्ही मंडळात खरिपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. श्रीरामपूर तालुका कृषी अधिकारी यांच्या अहवालात ज्वारीचे पीक नसल्याबाबत कळवलेले आहे. तसेच रब्बी हंगामातील सूर्यफूल, करडई, जिरायत गहू या पिकांची पेरणी देखील झालेली नसल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक यांनी संयुक्त अहवाल सादर केलेला आहे. उसासारखे एकमेव शाश्वत उत्पादन देणारे पीकही हुमनी आळीमुळे बाधित झाल्याने त्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. कपाशीला बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच सोयाबीन सारख्या पिकाचे विम्याचे पैसे मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असून मानसिक तणावाचे जीवन जगत आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ जाहीर होऊनही श्रीरामपूर तालुक्यावर अन्याय करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चा-याची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. निळवंडे धरणातून सध्या सोडलेल्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याबरोबर शेती सिंचनाचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर