शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

आमदार, नगराध्यक्ष बसले उपोषणाला : श्रीरामपूर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:03 IST

श्रीरामपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून, दुष्काळाच्या सवलती तातडीने सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले.

अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून, दुष्काळाच्या सवलती तातडीने सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. यामध्ये आमदार भाऊसाहेब कांबळे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सभापती दीपकराव पटारे, शरद नवले, संगीता गांगुर्डे, कल्याणी कानडे, वैशाली मोरे, गिरीधर आसने, गणेश मुद्गुले, रामभाऊ लीपटे, भाऊसाहेब बांद्रे, राधाकृष्ण आहेर, संतोष कानडे, संजय बाहुले, रज्जाक पठाण, संचित गिरमे, नितीन थोरात, शिवाजी शेजूळ, संदीप शेलार, अनिल थोरात, कलीम कुरेशी, राजेश अलघ, रवींद्र गुलाटी, शामलिंग शिंदे, अंजुमभाई शेख आदिंसह पदाधिकारी सहभागी झाले.श्रीरामपूर तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झालेला असून, सध्या पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. शेती व्यवसाय प्रचंड अडचणीत आलेला आहे. श्रीरामपूर महसूल अंतर्गत चार महसूल मंडळे आहेत. यापैकी बेलापूर महसूल मंडळात शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे. बेलापूर महसूल मंडळापेक्षा गंभीर परिस्थिती इतर तिन्ही महसूल मंडळात असतानाही ते दुष्काळाच्या सवलतीपासून अद्यापर्यंत वंचित आहे. या तिन्ही मंडळात खरिपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. श्रीरामपूर तालुका कृषी अधिकारी यांच्या अहवालात ज्वारीचे पीक नसल्याबाबत कळवलेले आहे. तसेच रब्बी हंगामातील सूर्यफूल, करडई, जिरायत गहू या पिकांची पेरणी देखील झालेली नसल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक यांनी संयुक्त अहवाल सादर केलेला आहे. उसासारखे एकमेव शाश्वत उत्पादन देणारे पीकही हुमनी आळीमुळे बाधित झाल्याने त्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. कपाशीला बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच सोयाबीन सारख्या पिकाचे विम्याचे पैसे मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असून मानसिक तणावाचे जीवन जगत आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ जाहीर होऊनही श्रीरामपूर तालुक्यावर अन्याय करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चा-याची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. निळवंडे धरणातून सध्या सोडलेल्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याबरोबर शेती सिंचनाचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर