शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी ‘मिशन माणुसकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जगभरात अनेक देशांत धर्मांध शक्तींची सत्ता लोकांवर लादली जात आहे. या धर्मांध सत्ताधिकाऱ्यांनी मानवी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जगभरात अनेक देशांत धर्मांध शक्तींची सत्ता लोकांवर लादली जात आहे. या धर्मांध सत्ताधिकाऱ्यांनी मानवी मुल्यांचा विनाश आरंभला आहे. परिणामी माणसांचे माणसांपासून अलगीकरण करण्याची धूर्त खेळी सत्ताधाऱ्यांकडून खेळली जात आहे. त्यामुळे या धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी ‘मिशन माणुसकी’ अभियान राबवून माणसात माणूसपण पेरणारी माणुसकीची शाळा राज्यात सुरु केली आहे. त्यासाठी १०२ शिक्षक राज्यभरात शिबिरे घेणार असून, लोकांना माणूसपणाची शिकवण दिली जाणार आहे, असे लोकशाहीर संभाजी भगत यांनी सांगितले.

कोरोनानंतर नगरमध्ये रविवारी (दि. २४) माणुसकीची कार्याशाळा झाली. यानिमित्ताने भगत यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या जगभरात धर्मांध शक्ती सत्तेवर आहेत. त्यांच्याकडून मानवी मुल्यांचे अध:पतन सुरु आहे. माणूस माणसापासून तुटत असून, हे धर्मांध सत्ताधारी संघटित होत आहेत. त्यांनी संघटित होऊन मानवी मुल्यांचा ऱ्हास करुन लोकांवर विलगीकरणाची व्यवस्था लादली आहे. मानवी मूल्य पुन्हा लोकांमध्ये रुजवून लोकांनी एकमेकांकडे माणूस म्हणून पाहायला शिकले पाहिजे, मानवतावादी दृष्टीकोन वाढीस लागला पाहिजे, यासाठी मिशन माणुसकी अंतर्गत माणुसकीची शाळा राज्यभर सुरु करण्यात आली आहे, असे भगत यांनी सांगितले.

...................

मानवी मूल्य शिकवणार

राज्यभरात १०२ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. हे शिक्षक विविध शिबिरांच्या माध्यमातून लोकांना मानवी मुल्यांची शिकवण देतील. लहान मुलांना गाणी, कविता, खेळ विविध स्पर्धा अशा अनेक माध्यमातून मानवी मूल्य शिकवली जातील. विविध शिबिरांमधून मानवी मूल्य रुजविण्यासाठी एक कार्यक्रम आखण्यात आला आहे. माणुसकीच्या शाळेत तो सर्वांना शिकवला जाणार आहे. ही शाळा सर्वांसाठी मोफत असून, कोणाकडून एक रुपयाही घेतला जात नाही. पोरांपासून थोरांपर्यंत तसेच संपूर्ण कुटुंबही या शाळेत सहभागी होऊ शकते, असे भगत यांनी सांगितले.

...............

मुंबईतून झाली सुरुवात

दीड वर्षापूर्वी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये माणुसकीच्या शाळेला प्रारंभ झाला. मात्र, पुढे कोरानानंतर ही शाळा बंद झाली. कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीने ही शाळा वाढली. मारुती शेरकर, डॉ. प्रा. प्रतिभा जाधव, शिवाजी नाईकवाडी, प्रवीण जठार असे अनेक लेखक, शिक्षक, मानवतावादी कार्यकर्ते ‘मिशन माणुसकी’सोबत जोडले आहेत. कोणताही राजकीय पक्ष, संघटना टाळून ही माणुसकीची शाळा चालवली जाणार आहे, असे भगत म्हणाले.