शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

निधी खर्चात मिनी मंत्रालय नापास

By admin | Updated: August 20, 2014 23:27 IST

अहमदनगर: जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना निधी देऊनही तो खर्च केला जात नसल्याचे उघड झाले आहे़

अहमदनगर: विकास निधी पदरात पाडून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची धडपड सुरू असते़ परंतु त्यांना पुरेसा निधी मिळत नाही़ त्यामुळे अनेक योजना कागदावरच राहतात़ मात्र जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना निधी देऊनही तो खर्च केला जात नसल्याचे उघड झाले आहे़ अखर्चित दोन कोटींचा निधी तात्काळ परत करा, अशा सक्त सूचना जिल्हा नियोजन विभागाने जिल्हा परिषदेला दिल्या आहेत़ त्यामुळे खात्यावर जमा झालेला निधी परत करण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढावली आहे़शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात़ जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषदेला दरवर्षी कोट्यवधींचा निधी दिला जातो़ जिल्हा नियोजन विभागातून हा निधी वितरीत होत असतो़ जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी निधी खर्चाबाबत आढावा घेतला जातो़ जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०१२- १३ मध्ये जिल्हा परिषदेला १४२ कोटी ४० लाखांचा निधी देण्यात आला होता़ जिल्हा परिषदेच्या आरोग्य, लघु पाटबंधारे, शिक्षण, बांधकाम, पाणीपुरवठा, यासारख्या विभागातील विकास कामांसाठी हा निधी होता़ मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने त्या अर्थिक वर्षात तो खर्च केला नाही़ जिल्हा परिषदेने गत ३१ मार्चपर्यंत १४० कोटी रुपये खर्च केले़ उर्वरित २ कोटींच्या निधीतील कामे जिल्हा परिषदेने मुदतीत पूर्ण केलीच नाहीत़ वेळोवेळी आढावा घेऊनही उपयोग झाला नाही़ अखेर निधींवरच पाणी सोडावे लागले असून, जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा असलेले दोन कोटी शासनाला परत केले जाणार आहेत़जिल्हा नियोजन विभागाने सन २०१३- १४ मध्ये जिल्हा परिषदेस १६२ कोटी ४० लाख रुपये वितरीत केले़ यापैकी जिल्हा परिषदेने ८२ कोटी २९ लाख खर्च केले़ उर्वरित ८० कोटी अजूनही खर्च झाले नाहीत़ हा निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेला ३१ मार्च २०१५ पर्यंतची मुदत आहे़ त्यात आता विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे़ दोन महिने अचारसंहितेत्े जाणार आहेत़ या काळात नवीन कामे सुचविता येणार नाहीत़ त्यामुळे उर्वरित पाच महिन्यांत ८२ कोटी रुपये जिल्हा परिषदेला खर्च करावे लागतील़ अन्यथा पुन्हा हा निधीही परत जाईल, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)