शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

मिनी लॉकडाऊनचे निर्बंध मागे घ्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST

अहमदनगर : कोरोनाचे संक्रमण वाढत असताना मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लादण्यात आलेले कठोर निर्बंध मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, ...

अहमदनगर : कोरोनाचे संक्रमण वाढत असताना मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लादण्यात आलेले कठोर निर्बंध मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

यावेळी भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विलास गांधी, भाजप शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड. विवेक नाईक, आदी उपस्थित होते. कठोर निर्बंध लादताना छोटे दुकानदार, घाऊक व्यापारी, केशकर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक होते. कारखाने चालू पण दुकाने बंद, ट्रान्सपोर्ट सुरु तर गॅरेज व स्पेअर पार्टची दुकाने बंद, कोर्ट व वकिलांचे ऑफिस सुरु परंतु टायपिंगची दुकाने बंद, कापड मिल सुरु पण कापड दुकाने बंद असे अनेक प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय एकमेकांशी निगडीत आहेत. त्यामुळे अशा सर्व छोट्या-मोठ्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्यात यावा. गरिबांची जीवन आणि अर्थकारण दोन्ही प्रभावित होणार नाही. कामगारांचा रोजगार, कर्जावरील व्याज, वीजबिल, दुकानभाडे, कर्ज हप्ते, सर्वप्रकारचे कर इत्यादी अनेक प्रकारच्या संकटाला व्यापारी व गोरगरिबांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण अर्थचक्र बिघडले आहे. शनिवारी व रविवारी पुकारण्यात आलेल्या संपूर्ण लॉकडाऊनला सर्वांची तयारी व सहमती होती. मात्र, पाच दिवस कठोर निर्बंध लावून छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. सर्व दुकानदारांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.