शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

लाखो लिटर पाणी गटारात; प्राधिकरणाची डोळेझाक

By admin | Updated: June 2, 2014 00:36 IST

अनिल साठे, अहमदनगर दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा वाढत्या प्रमाणात जाणवत आहे.

अनिल साठे, अहमदनगर दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा वाढत्या प्रमाणात जाणवत आहे. पण, दहा गावाची तहान तृप्त होईल, इतके पाणी मोठ्या प्राणावर गटारात वाहून जात असताना अनेक निवेदने, आंदोलन पत्रव्यवहार करूनही दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी असलेल्या जीवन प्राधिकरणाची निष्क्रियता ठळकपणे समोर येत आहे. राष्ट्रीय संपत्ती असलेले पाणी गटारात वाहून जाताना अधिकारी मात्र हात वर करून डोळे झाकून बसले आहेत. भिंगार शहराला दररोज सरासरी तीन लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. लष्कराकडून दीड लाख ते एक लाख ऐंशी हजार लिटरपर्यंत पाणी पुरवठा होतो आहे. शहरात दोन हजार दोनशे नळजोड आहेत. प्रत्येक नळ जोड धारकांना अर्धा इंची नळीसाठी १५० तर एक इंचीसाठी ३०० रुपये प्रती महा पाणीपट्टी आकारली जाते. तर छावणी परिषद लष्कराकडून २५ रुपये ९४ पैसे दराने पाणी विकत घेते. ऐन उन्हाळ्यात नागरिक पाणी पाणी करीत असताना मात्र जलवाहिनी गळतीमुळे गेल्या चार वषार्पासून दररोज लाखो लिटर पाणी गटारात वाहून जात आहे. या प्रश्नी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने अनेकदा जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्राधिकरण व छावणी परिषद यांना निवेदन देण्यात आले. दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी असलेल्या जीवन प्राधिकरण यांना पत्र पाठवून तसेच बैठकीत निर्देश दिले असताना देखील कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष काम सुरु केलेले नाही. २३ फेब्रुवारी २००६ पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेकडो वेळा पत्रव्यवहार करून जलवाहिनी गळतीची दुरुती करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. सदर जलवाहिनीचा मार्ग बदलावा यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. जलवाहिनी गळतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. दुरुस्ती करताना केलेल्या खोदाईमुळे झालेली रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. दुरुस्ती दरम्यान खोदाईमुळे झालेले खड्डे बुजवणे व दुरुस्त करणे ही जबाबदारीही जीवन प्राधिकरणाची असताना ही दुर्लक्ष केले जात आहे. (वार्ताहर) जीवन प्राधिकरणने सदर खांब आम्ही आमच्या स्वखर्चाने काढत आहोत, असे सांगत त्यासाठी आम्हाला कोटेशन मागितले होते ते आम्ही त्यांना दिले. १.३ टक्के देखरेखचा चार्ज आम्ही भरण्यास सांगितला होता. वरिष्ठांनी सदर कोटेशन फेटाळून लावले आहे. असे सांगून तो खर्च तुम्ही करावा, असे सांगितले. या प्रश्नाबाबतचे जनहित लक्षात घेऊन आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. -एन. एम. काकडे, उपअभियंता विद्युत, जीवन प्राधिकरण वाय. सी. सुतार यांच्याशी दीड महिन्यापूर्वी भिंगार प्रतिनिधीने संपर्क साधला होता. त्यावेळी विद्युत महामंडळाकडे उंगलीनिर्देश करीत ते सहकार्य करीत नाही, असा आरोप केला होता. जलवाहिनीला गळती लागलेल्या ठिकाणी काही फुटावर विजेचा खांब आहे, तो त्यांनी काढून घ्यावा. तो खांब हलवण्यासाठी सुमारे ७० हजार खर्च मंडळाने करावा, असी भूमिका सुतार यांनी मांडली होती. अन्य ठिकाणच्या गळती संदर्भात विचारले असता ते काम लगेच उद्या सुरु करू, असे म्हणाले होते. आजतागायत कोणत्याही प्रकारे पाणी गळती थांबविण्यासाठी प्रयत्न झालेला नाही. शुक्रवारी त्यांच्याशी संपर्क साधला असता छावणी परिषदच्या नावाने खडे फोडून हात वर केले आहेत. छावणी परिषदेला जबाबदार धरत आहेत. प्रत्यक्ष जबाबदारी जीवन प्राधिकरणची आहे. जीवन प्राधिकरण यांचे सोबत गेल्या सात ते आठ वर्षापासून चर्चा व पत्रव्यवहार सुरु आहे. वारंवार जलवाहिनी गळती मुळे रस्त्याचे नुकसान होत आहे. जीवन प्राधिकरण शेकडो पत्र पाठवूनही दखल घेत नाही. -आर. आर. राठोड, शाखा अभियंता ( राष्ट्रीय महामार्ग, अहमदनगर) जलवाहिनी गळती संदर्भात संबंधित खात्याला वेळोवेळी कळवले आहे. पत्रव्यवहार केला आहे. दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणाची आहे. छावणी परिषद एम एस कडून २५ रुपये ९४ पैसे दराने पाणी विकत घेते. मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही. -शिरकुल, छावणी परिषद कार्यालय, अधीक्षक . अनेक तांत्रिक अडचणी आहेत. छावणी परिषद सहकार्य करीत नाही. जलवाहिनी गळती संदर्भात सीईओ दोन ते तीन वेळा आले होते. अडचणी दूर करून आम्ही लवकर काम सुरु करू. -वाय सी सुतार, जीवन प्राधिकरण.