शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

मिनरल वॉटर उद्योगासाठी लाखो लीटर पाणी

By admin | Updated: April 1, 2016 00:53 IST

अण्णा नवथर, अहमदनगर अहमदनगर : एकीकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता पाण्यावाचून तहानली आहे. अनेक गावांच्या घशाला कोरड पडली आहे.

अण्णा नवथर, अहमदनगरअहमदनगर : एकीकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता पाण्यावाचून तहानली आहे. अनेक गावांच्या घशाला कोरड पडली आहे. दुसरीकडे औद्योगिक वसाहतीत बाटली बंद पाण्याच्या कारखान्यांना मात्र मुळा धरणातून २४ तास आणि लाखो लीटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या या कारखान्यांबाबत दुष्काळात काय धोरण घ्यायचे, याबाबत शासनाचा काहीही आदेश नाही. त्यामुळे प्रशासनाने ‘हाताची घडी, तोंडावर बोट’, अशी भूमिका घेतली आहे. दुष्काळी स्थितीत प्रशासनाची भूमिका आश्चर्यकारक आहे.जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई आहे़ टँकरने पाचशेचा आकडा पार केला आहे़ गावोगावचे उदभव कोरडे पडू लागले आहेत़ दक्षिण जिल्ह्यात मुळा धरण हा एकमेव मोठा जलस्त्रोत आहे़ त्यावर या भागाची भिस्त आहे़ या धरणात सध्या अवघे पावणे तीन टीएमसी पाणी आहे़ उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे सरकारचे आदेश आहेत़ धरणांतील पाण्याचा काटकसरीने वापर होतो का ? याची शहानिशा केली असता वरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़ नागापूरसह सुपा औद्योगिक वसाहतींतील बाटली बंद पाणी तयार करणाऱ्या कारखान्यांना मुळा धरणातील शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे़ दोन्ही वसाहतीत असे ८ कारखाने सुरू आहेत़ या कारखान्यांना दररोज महामंडळाकडून ५० हजार लीटर पाणी मीटरव्दारे दिले जाते़ या पाण्यावर प्रक्रिया करून कारखानदार ते बाजारात विकतात.नागापूरसह सुपा आणि नेवासा औद्योगिक वसाहतीसाठी दररोज ३२ एमएलटी पाणी मुळा धरणातून उपसले जाते़ त्यातून १ हजार ६७७ कारखान्यांना पाणी मिळते़ इतर उत्पादने घेणाऱ्या कारखान्यांना फारसे पाणी लागत नाही़ पण, बाटली बंद पाणी तयार करणाऱ्या कारखान्यांना भरपूर पाणी लागते. दुष्काळात या कंपन्यांचा व्यवसाय तेजीत आहे. अनेक गावच्या पाणी योजना बंद पडतात. त्या खराब होतात. मात्र या कारखान्यांच्या पाणी पुरवठ्यात सहसा व्यत्यय येत नाही. टंचाईच्या काळात या कारखान्यांबाबत काय भूमिका घ्यायची याचे काहीही धोरण सरकारी दरबारी नाही. त्यामुळे ऐन दुष्काळातही या कारखान्यांचा पाण्याचा व्यापार जोरात सुरु आहे. मुळा धरणातील पाण्यावर प्रक्रिया करून ते बाटलीव्दारे बाजारात विकले जाते़ उद्योगासाठी आरक्षित असलेल्या पाण्यातून या कारखान्यांना औद्योगिक विकास महामंडळाकडून हे पाणी पुरविण्यात येत आहे़ त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी लागणारा कच्चा माल शुध्द असल्याने कारखान्यांना त्यावर फार प्रक्रिया करावी लागत नाही़ कमी पैशात हा व्यवसाय सुरू होतो़औद्योगिक वसाहतीत उद्योजकांनी एकत्र येऊन जिमखाना उभारला आहे़ त्यात मोठा जलतरण तलावही आहे़ तलावासह इतर कामासाठी जिमखान्याला औद्योगिक विकास महामंडळाकडून दररोज १० हजार लीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो़ जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिले आहेत़ मात्र औद्योगिक विकास महामंडळाला तसे आदेश प्राप्त झाले नाहीत़ त्यामुळे पाणीपुरवठा सुरूच असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़ औद्योगिक वसाहतीतील उद्योगांकडून येणाऱ्या मागणीनुसार पाणीपुरवठा केला जातो़ मीटरव्दारे त्यांना पाणी देण्यात येत आहे़ मिनरल वॉटरच्या कारखान्यांना पाणीपट्टी जास्त असून, त्यांना सध्या पाणीपुरवठा सुरू आहे़ आदेश आल्यास कारखान्यांचे पाणी खंडित केले जाईल़ -विनायक खांदवे, उपअभियंताउद्योगासाठी मुळा धरणातील पाणी आरक्षित आहे़ त्यातून ते कारखान्यांना पाणी देतात़ ते कुणाला द्यावे हा त्यांचा अधिकार आहे़ मात्र पाणी कमी पडल्यास ते कोणत्या कारखान्यांना पाणी पुरवितात, याचा आढावा घेऊन कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाईल, परंतु, सध्या तरी तशी आवश्यकता वाटत नाही़ -अनिल कवडे, जिल्हाधिकारी.