शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 15:30 IST

जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत सुमारे साडेपाच लाख लाभार्थी आहेत. मात्र प्रत्यक्ष किती लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत पैसे मिळाले याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही गोंधळ उडाला आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत सुमारे साडेपाच लाख लाभार्थी आहेत. मात्र प्रत्यक्ष किती लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत पैसे मिळाले याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही गोंधळ उडाला आहे.शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रूपये तीन टप्प्यात मिळणार आहेत. त्यातील २ हजार रूपयांचा पहिला टप्पा शेतकºयांना दिला असल्याचे शासनाने जाहीर केले.त्यामुळे जिल्ह्यातील कितीजण या योजनेसाठी पात्र आहेत किंवा जिल्ह्यासाठी किती रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा झाली, याबाबत या योजनेचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकाºयांकडे माहिती घेतली असता, त्यांनी रकमेबाबत माहिती नसल्याचे सांगितले.जिल्हा प्रशासन पातळीवर योजनेस प्रसिद्धी देणे, योजनेच्या कालबद्ध कार्यक्रमानुसार माहिती संकलित करून ती शासकीय पोर्टलवर अपलोड करणे एवढेच काम होते. प्रत्यक्ष किती शेतकºयांना पैसे आले याबाबत कृषी आयुक्त कार्यालयाकडे माहिती मिळू शकेल, असे ते म्हणाले.त्यामुळे या योजनेची प्रत्यक्ष काय स्थिती आहे, याबाबत सर्वच पातळीवर गोंधळाचे वातावरण आहे. केंद्र शासनाने मागील आठवड्यात या योजनेच्या पहिल्या टप्प्यापोटी पात्र शेतकºयांच्या खात्यावर २ हजार रूपये जमा केल्याचे जाहीर केले आहे. मात्र असे कोणतेही पैसै जमा झाल्याबाबत शेतकºयांकडून दुजोरा मिळालेला नाही. जिल्ह्यातील काही शेतकºयांनी तर पैसै आले व पुन्हा मागे गेले अशा तक्रारी केल्या आहेत, तर बºयाच शेतकºयांनी आपले खातेच तपासले नसल्याने खरंच असे पैसे आले आहेत का याबाबत त्यांनाही माहिती नाही. जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत १ हजार ६०१ गावांतील ८ अ प्रमाणे ९ लाख ४३ हजार ६४२ खातेदार शेतकºयांची संख्या असून या योजनेंतर्गत परिशिष्ट ८ अ प्रमाणे अनिवार्य माहिती संकलित झालेल्या १ हजार ६०१ गावांतील पात्र शेतकरी कुटुंबांची संख्या ५ लाख ६८ हजार २४१ इतकी आहे. त्यापैकी ४ लाख ३० हजार शेतकºयांची माहिती आतापर्यंत एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर