शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मायंबा-मढी देवस्थान आता रोपवेने जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST

तीसगाव : राज्यासह देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या नाथभक्तांना सुकर ठरावे यासाठी श्रीक्षेत्र मायंबा व मढी देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने ...

तीसगाव : राज्यासह देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या नाथभक्तांना सुकर ठरावे यासाठी श्रीक्षेत्र मायंबा व मढी देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने रोपवे सुविधेचा संयुक्तिक उपक्रम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. दोन्ही गुरु-शिष्यांची संजीवन समाधीची गर्भगिरीतील ही पौराणिक स्थळे हवाई अंतराने जोडण्यासाठीच्या प्रकल्पाला पंचेचाळीस कोटींचा खर्च येणार आहे. देवस्थानांना रोपवेने जोडण्याचा हा पथदर्शी उपक्रम राज्यातील एकमेव ठरणार आहे.

याबाबत आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने दोन्ही विश्वस्त मंडळांची बैठक रविवारी आष्टी येथे झाली. मायंबा देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष राधाकिसन मरकड, विधिज्ञ शिवजित डोके यावेळी उपस्थित होते. श्रीक्षेत्र वृद्धेश्वरला नाथसंप्रदायाचे उगमस्थान मानले जाते. जवळच नवनाथांपैकी आद्य मानल्या गेलेल्या मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे. तेथून उत्तरेस सात किलोमीटर अंतरावर चैतन्य कानिफनाथांचे संजीवन समाधी असलेले मढी गाव आहे. गर्भगिरी डोंगर, दरी, पठार भागात नाथस्नानाचे सूर्यकुंड, तपश्चर्या, भेटी चर्चा, संवादाची स्थळे आहेत.

सभोवताली वैविध्यपूर्ण अत्यंत दुर्मिळ अशा वनौषधी आहेत. हा सर्व निर्जनस्थळीचा पौराणिक ठेवा हवाई अंतराने भाविकांच्या दृष्टिक्षेपात येणार आहे. या सर्व बाबींवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून तिन्ही देवस्थाने जोडली गेली आहेत. वळणाकार घाटरस्ता, बिबट्यासह जंगली श्वापदांचा वावर अशा समस्या टाळण्याच्या उद्देशाने दोन्ही देवस्थान समित्यांनी हा संयुक्त विकासाचा कृती आराखडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.