शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मराठी माणसाने धाडस करणे आवश्यक- धनंजय दातार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:38 IST

 यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो. यशस्वी होण्यासाठी कष्टच करावे लागतात. मराठी माणसाने न डगमगता धाडस केले तर तो जग पादाक्रांत करू शकतो. माझ्या मनात गरिबीविषयी चीड होती. त्यातूनच मी उद्योजक बनलो, असे आपल्या यशाचे गमक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी येथे उलगडले.

कोपरगाव :  यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो. यशस्वी होण्यासाठी कष्टच करावे लागतात. मराठी माणसाने न डगमगता धाडस केले तर तो जग पादाक्रांत करू शकतो. माझ्या मनात गरिबीविषयी चीड होती. त्यातूनच मी उद्योजक बनलो, असे आपल्या यशाचे गमक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी येथे उलगडले. मूळचे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातील किरणा दुकानाचे संचालक ते दुबईस्थित अल अदिल समुहाचे व्यवस्थापकीय संचालक बनलेल्या दातार यांची रोटरी क्लबच्या स्नेह जल्लोष या कार्यक्रमात प्रकट मुलाखत झाली. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी दातार यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. ते म्हणाले, मी कोणतेच काम कमी लेखत नाही. जे काम मिळेल ते करीत राहिलो. मुंबईत प्रसंगी दारोदारी फिरून विविध उत्पादने विकली. यातून माझा आत्मविश्वास वाढत गेला. त्यातूनच  यशाला गवसणी घालत गेलो. दुबईत गेल्यावर सुरूवातीला मिळेल ते काम केले.  आईचे सर्व दागिने मोडून तेथे १५० स्क्वेअर फूट जागेत व्यवसाय सुरु केला. मात्र काही दिवसातच तो व्यवसाय तोट्यात गेला. मात्र, भारतात परत जाणार नाही असा निश्चय केला होता.  दरम्यान इराक व कुवेत यांच्यात युद्ध झाल्याने त्यावेळी माझी १ रुपयाची वस्तू ४ रुपयाला विकली गेली. त्यातून व्यवसायाला उभारी मिळाली. आखाती देशात आपण ४१ सुपर मार्केटची निर्मिती करून रिटेल आऊट लेटचे जाळे निर्माण केले. तसेच ‘मसालाकिंग’ म्हणून आपली जी ख्याती झाली. त्यामागे केवळ मेहनत हेच एक भांडवल होते. कोणत्याही व्यवसायात यश मिळविण्यासाठी तीन वर्षे लागतात. पैशातूनच पैसा निर्माण केला जातो. कमविलेल्या पैशाचा स्वत:ही आनंद घ्या आणि गरजवंतांनाही मदत करा. माझे लहानपणापासूनच दुबईत जाण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी वयाच्या सोळाव्या वर्षी मी पासपोर्ट काढला आणि विसाव्या वर्षी दुबईत गेलो, असेही त्यांनी सांगितले.यावेळी डॉ.दातार यांच्या पत्नी वंदना दातार, आंतरराष्ट्रीय रोटरीचे निर्वाचित प्रेसिडेंट शेखर मेहता, आंतरराष्ट्रीय रोटरीचे प्रतिनिधी बांगलादेशचे डॉ. सलीम रेझा, गव्हर्नर राजेंद्र भामरे, अश्विनी भामरे, राशी मेहता, रुमा देवी, कॉन्फरन्स सल्लागार किशोर केडीया, नियोजित गव्हर्नर शब्बीर शाकीर, रमेश मेहर, आनंद झुनझुनवाला, मिडटाऊन प्रेसिडेंट संदीप पवार, रवींद्र ओस्तवाल, राजीव शर्मा, डॉ. महेश तेलरांधे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राकेश डिडवानीया, असिस्टंट गव्हर्नर प्रसाद पेठकर, नाना शेवाळे, कुंदन चव्हाण, दिनेश जाधव, सचिन शहा, शाम कासार, विलास शिरोरे, डॉ. विश्राम निकम, विनायक पाटील, डॉ. दिलीप भावसार, विलास सोनजे, डॉ. टी. पी. देवरे, दिलीप संन्याशीव, विठ्ठल तापडीया, राजेंद्र दिघे, सुमित बच्छाव, सर्जेराव पवार, राजेंद्र देवरे, प्रशांत पवार,संजय सूर्यवंशी, शामल सुरते, संगीता परदेशी, वंदना देवरे, वंदना चव्हाण, स्नेहल राहुडे उपस्थित होते. कॉन्फरन्स अध्यक्ष रवींद्र ओस्तवाल यांनी प्रास्ताविक केले. मयुर मर्चंट, अतुल शहा व टॉबी भगवागर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांचे भाषण झाले.गणितात पाचवेळा नापास तरीही यशस्वीमाझा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. वडील एअर फोर्समध्ये होते. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण हे शासकीय शाळेत झाले. शिक्षण घेत असताना खूप संघर्ष करावा लागला. मी शाळेतील शेवटून पहिला येणारा विद्यार्थी होतो. दहावीला तर गणितात पाच वेळा नापास झालो. परंतु शिक्षण पूर्णच करायचे अशी जिद्द मनात ठेऊन डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखतbusinessव्यवसाय