शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मराठी माणसाने धाडस करणे आवश्यक- धनंजय दातार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:38 IST

 यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो. यशस्वी होण्यासाठी कष्टच करावे लागतात. मराठी माणसाने न डगमगता धाडस केले तर तो जग पादाक्रांत करू शकतो. माझ्या मनात गरिबीविषयी चीड होती. त्यातूनच मी उद्योजक बनलो, असे आपल्या यशाचे गमक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी येथे उलगडले.

कोपरगाव :  यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो. यशस्वी होण्यासाठी कष्टच करावे लागतात. मराठी माणसाने न डगमगता धाडस केले तर तो जग पादाक्रांत करू शकतो. माझ्या मनात गरिबीविषयी चीड होती. त्यातूनच मी उद्योजक बनलो, असे आपल्या यशाचे गमक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी येथे उलगडले. मूळचे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातील किरणा दुकानाचे संचालक ते दुबईस्थित अल अदिल समुहाचे व्यवस्थापकीय संचालक बनलेल्या दातार यांची रोटरी क्लबच्या स्नेह जल्लोष या कार्यक्रमात प्रकट मुलाखत झाली. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी दातार यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. ते म्हणाले, मी कोणतेच काम कमी लेखत नाही. जे काम मिळेल ते करीत राहिलो. मुंबईत प्रसंगी दारोदारी फिरून विविध उत्पादने विकली. यातून माझा आत्मविश्वास वाढत गेला. त्यातूनच  यशाला गवसणी घालत गेलो. दुबईत गेल्यावर सुरूवातीला मिळेल ते काम केले.  आईचे सर्व दागिने मोडून तेथे १५० स्क्वेअर फूट जागेत व्यवसाय सुरु केला. मात्र काही दिवसातच तो व्यवसाय तोट्यात गेला. मात्र, भारतात परत जाणार नाही असा निश्चय केला होता.  दरम्यान इराक व कुवेत यांच्यात युद्ध झाल्याने त्यावेळी माझी १ रुपयाची वस्तू ४ रुपयाला विकली गेली. त्यातून व्यवसायाला उभारी मिळाली. आखाती देशात आपण ४१ सुपर मार्केटची निर्मिती करून रिटेल आऊट लेटचे जाळे निर्माण केले. तसेच ‘मसालाकिंग’ म्हणून आपली जी ख्याती झाली. त्यामागे केवळ मेहनत हेच एक भांडवल होते. कोणत्याही व्यवसायात यश मिळविण्यासाठी तीन वर्षे लागतात. पैशातूनच पैसा निर्माण केला जातो. कमविलेल्या पैशाचा स्वत:ही आनंद घ्या आणि गरजवंतांनाही मदत करा. माझे लहानपणापासूनच दुबईत जाण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी वयाच्या सोळाव्या वर्षी मी पासपोर्ट काढला आणि विसाव्या वर्षी दुबईत गेलो, असेही त्यांनी सांगितले.यावेळी डॉ.दातार यांच्या पत्नी वंदना दातार, आंतरराष्ट्रीय रोटरीचे निर्वाचित प्रेसिडेंट शेखर मेहता, आंतरराष्ट्रीय रोटरीचे प्रतिनिधी बांगलादेशचे डॉ. सलीम रेझा, गव्हर्नर राजेंद्र भामरे, अश्विनी भामरे, राशी मेहता, रुमा देवी, कॉन्फरन्स सल्लागार किशोर केडीया, नियोजित गव्हर्नर शब्बीर शाकीर, रमेश मेहर, आनंद झुनझुनवाला, मिडटाऊन प्रेसिडेंट संदीप पवार, रवींद्र ओस्तवाल, राजीव शर्मा, डॉ. महेश तेलरांधे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राकेश डिडवानीया, असिस्टंट गव्हर्नर प्रसाद पेठकर, नाना शेवाळे, कुंदन चव्हाण, दिनेश जाधव, सचिन शहा, शाम कासार, विलास शिरोरे, डॉ. विश्राम निकम, विनायक पाटील, डॉ. दिलीप भावसार, विलास सोनजे, डॉ. टी. पी. देवरे, दिलीप संन्याशीव, विठ्ठल तापडीया, राजेंद्र दिघे, सुमित बच्छाव, सर्जेराव पवार, राजेंद्र देवरे, प्रशांत पवार,संजय सूर्यवंशी, शामल सुरते, संगीता परदेशी, वंदना देवरे, वंदना चव्हाण, स्नेहल राहुडे उपस्थित होते. कॉन्फरन्स अध्यक्ष रवींद्र ओस्तवाल यांनी प्रास्ताविक केले. मयुर मर्चंट, अतुल शहा व टॉबी भगवागर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांचे भाषण झाले.गणितात पाचवेळा नापास तरीही यशस्वीमाझा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. वडील एअर फोर्समध्ये होते. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण हे शासकीय शाळेत झाले. शिक्षण घेत असताना खूप संघर्ष करावा लागला. मी शाळेतील शेवटून पहिला येणारा विद्यार्थी होतो. दहावीला तर गणितात पाच वेळा नापास झालो. परंतु शिक्षण पूर्णच करायचे अशी जिद्द मनात ठेऊन डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखतbusinessव्यवसाय