शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गावाला एक माणूस

By admin | Updated: April 20, 2016 23:43 IST

अहमदनगर : पीक विमा योजनेतील निकष आता बदलले असून, शेतकऱ्यांचा हिस्सा कमी करण्यात आला आहे़

अहमदनगर : पीक विमा योजनेतील निकष आता बदलले असून, शेतकऱ्यांचा हिस्सा कमी करण्यात आला आहे़ यापूर्वी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग ४८ टक्क्यांपर्यंत होता़ तो ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे़ पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी प्रत्येक गावासाठी एक कर्मचारी नेमण्याचे नियोजन आहे, असे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी सांगितले़‘प्रशासन-जनता संवाद’ या ‘लोकमत’च्या उपक्रमात बुधवारी बऱ्हाटे यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय टीमशी संवाद साधला. बऱ्हाटे म्हणाले, सरकारने जुन्या पीक योजनेत बदल केले आहेत़ हे बदल सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा, यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एका गावात विमा योजनेच्या काळात नेमण्यात येणार आहे़ त्यांनी संबंधीत गावात जाऊन योजनेतील बदल सांगून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे़ नवीन योजनेत शेतकऱ्यांचा हिस्सा कमी करण्यात आला आहे़ त्यामुळे पूर्वी असलेला ४८ टक्के सहभाग वाढवून तो ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे़ हे करताना ज्या मंडळातून पीक विमा योजनेत आतापर्यंत कमी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे, त्या मंडळावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे़ त्यामुळे विमा योजनेतील सहभाग वाढू शकतो़(प्रतिनिधी)मागेल त्याला शेततळे, या योजनेतून शेततळे घेण्यासाठी जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन प्रस्ताव दिले आहेत़ मात्र, जिल्ह्यासाठी २३९२ शेततळ्यांचे उद्दिष्ट असल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांचा पुढील उद्दिष्टात समावेश केला जाईल़ ‘फर्स्ट कम, फर्स्ट रेफरन्स’नुसार पहिल्या २३९२ शेतकऱ्यांना या योजनेतून शेततळ्यासाठी अनुदान मिळणार आहे़ तसेच दारिद्य्ररेषेखालील व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला यात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे बऱ्हाटे यांनी सांगितले़‘जलयुक्त’मध्ये ७० टक्के काम कृषी विभागाचेजलयुक्त शिवार योजनेत सर्वाधिक ७५ टक्के काम कृषी विभागाच्यामार्फत करण्यात आले आहे़ नाला बल्डिंग, सीसीटी बंधारे, सलग समतल चर, केटीवेअर अशी विविध जलसंधारणाची कामे या योजनेतून करण्यात आली आहेत़ केटीवेअर, बंधाऱ्यांमध्ये पावसाच्या पाण्यात वाहून येणारा गाळ अडविल्यास त्याचे आयुष्य वाढते़ पावसाळ्यात पाचवेळा चर भरतील आणि जिरतील, असे आमचे नियोजन आहे़ त्यातून पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे़मका, तूर, उडीद, मूग पिकाखाली क्षेत्र वाढणारकमी पावसामुळे उसाखालील क्षेत्रात मोठी घट झाली आहे़ हे क्षेत्र यंदा कांदा पिकाखाली आले आहे़ आता कांद्याचे रिकामे होणारे क्षेत्र मका, तूर, उडीद, मूग या पिकांखाली येऊन त्यांचे क्षेत्र वाढणार आहे़ कृषी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेती पद्धत विकसित करावी लागणार आहे़ काटेकोरपणे शेतीचे नियोजन व रासायनिक खते, औषधांवरील खर्च कमी करण्यावर भर राहील़ खत वापराचे प्रमाण ठरविले जाईल़ ३६ गटांमध्ये झिरो बजेट शेतीचा उपक्रम तीन वर्षांसाठी राबविण्या येणार आहे, असे बऱ्हाटे म्हणाले़