शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

प्रत्येक गावाला एक माणूस

By admin | Updated: April 20, 2016 23:43 IST

अहमदनगर : पीक विमा योजनेतील निकष आता बदलले असून, शेतकऱ्यांचा हिस्सा कमी करण्यात आला आहे़

अहमदनगर : पीक विमा योजनेतील निकष आता बदलले असून, शेतकऱ्यांचा हिस्सा कमी करण्यात आला आहे़ यापूर्वी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग ४८ टक्क्यांपर्यंत होता़ तो ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे़ पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी प्रत्येक गावासाठी एक कर्मचारी नेमण्याचे नियोजन आहे, असे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी सांगितले़‘प्रशासन-जनता संवाद’ या ‘लोकमत’च्या उपक्रमात बुधवारी बऱ्हाटे यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय टीमशी संवाद साधला. बऱ्हाटे म्हणाले, सरकारने जुन्या पीक योजनेत बदल केले आहेत़ हे बदल सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा, यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एका गावात विमा योजनेच्या काळात नेमण्यात येणार आहे़ त्यांनी संबंधीत गावात जाऊन योजनेतील बदल सांगून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे़ नवीन योजनेत शेतकऱ्यांचा हिस्सा कमी करण्यात आला आहे़ त्यामुळे पूर्वी असलेला ४८ टक्के सहभाग वाढवून तो ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे़ हे करताना ज्या मंडळातून पीक विमा योजनेत आतापर्यंत कमी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे, त्या मंडळावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे़ त्यामुळे विमा योजनेतील सहभाग वाढू शकतो़(प्रतिनिधी)मागेल त्याला शेततळे, या योजनेतून शेततळे घेण्यासाठी जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन प्रस्ताव दिले आहेत़ मात्र, जिल्ह्यासाठी २३९२ शेततळ्यांचे उद्दिष्ट असल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांचा पुढील उद्दिष्टात समावेश केला जाईल़ ‘फर्स्ट कम, फर्स्ट रेफरन्स’नुसार पहिल्या २३९२ शेतकऱ्यांना या योजनेतून शेततळ्यासाठी अनुदान मिळणार आहे़ तसेच दारिद्य्ररेषेखालील व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला यात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे बऱ्हाटे यांनी सांगितले़‘जलयुक्त’मध्ये ७० टक्के काम कृषी विभागाचेजलयुक्त शिवार योजनेत सर्वाधिक ७५ टक्के काम कृषी विभागाच्यामार्फत करण्यात आले आहे़ नाला बल्डिंग, सीसीटी बंधारे, सलग समतल चर, केटीवेअर अशी विविध जलसंधारणाची कामे या योजनेतून करण्यात आली आहेत़ केटीवेअर, बंधाऱ्यांमध्ये पावसाच्या पाण्यात वाहून येणारा गाळ अडविल्यास त्याचे आयुष्य वाढते़ पावसाळ्यात पाचवेळा चर भरतील आणि जिरतील, असे आमचे नियोजन आहे़ त्यातून पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे़मका, तूर, उडीद, मूग पिकाखाली क्षेत्र वाढणारकमी पावसामुळे उसाखालील क्षेत्रात मोठी घट झाली आहे़ हे क्षेत्र यंदा कांदा पिकाखाली आले आहे़ आता कांद्याचे रिकामे होणारे क्षेत्र मका, तूर, उडीद, मूग या पिकांखाली येऊन त्यांचे क्षेत्र वाढणार आहे़ कृषी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेती पद्धत विकसित करावी लागणार आहे़ काटेकोरपणे शेतीचे नियोजन व रासायनिक खते, औषधांवरील खर्च कमी करण्यावर भर राहील़ खत वापराचे प्रमाण ठरविले जाईल़ ३६ गटांमध्ये झिरो बजेट शेतीचा उपक्रम तीन वर्षांसाठी राबविण्या येणार आहे, असे बऱ्हाटे म्हणाले़