शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कोविड नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:19 IST

शिर्डी : कोविड नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. टास्‍क फोर्सने आरोग्‍य सुविधांच्‍या मूलभूत गोष्‍टींवर लक्ष केंद्रित करायला हवे. लॉकडाऊनबाबत ...

शिर्डी : कोविड नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. टास्‍क फोर्सने आरोग्‍य सुविधांच्‍या मूलभूत गोष्‍टींवर लक्ष केंद्रित करायला हवे. लॉकडाऊनबाबत विचार करणारे टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील समस्यांचा विचार केला आहे का, असा प्रश्न उपस्थित करून लॉकडाऊन लावण्यापूर्वी मदतीचे पॅकेज जाहीर करा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

शिर्डी येथे सोमवारी अधिकाऱ्यांसमवेत कोविड परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, आ.विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करून, लॉकडाऊनच्या नावाखाली सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. सरकारच्या उदासीनतेमुळे रुग्णांना हॉस्पिटल उपलब्ध होत नाही, ऑक्सिजन सुविधा नाही. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. सरकारचे निर्णय फक्त कागदोपत्री असून, अंमलबजावणी मात्र शून्य आहे. त्यामुळेच सरकार सर्व पातळ्यांवर गोंधळले आहे. कोणताही निर्णय सरकार घेऊ शकत नाही.

कोविड रुग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊनचा निर्णय करणाऱ्या टास्क फोर्सचे अधिकारी मंत्रालयात बसून सरकारला सूचना करीत असतील, तर ते उचित नाही. या अधिकाऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात जाऊन वास्तव परिस्थिती जाणून घेतली, ग्रामीण भागातील प्रश्नांची मंत्रिमंडळात चर्चा होताना दिसत नाही. मंत्र्यांची विधान फक्त शहरी भागाची काळजी करणारे दिसतात, असे सांगून शहरी भागाबरोबरच लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागाचे मोठे नुकसान होईल, याची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशारा विखे यांनी दिला.

यापूर्वीच कोविडमुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, सामान्य व्यापारी, बारा बलुतेदार, सलून चालक आर्थिक संकटात भरडला गेला आहे.

कोविड रुग्णांसाठी बेडची व्यवस्था पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नर्सिंग रूमच्या नोंदणी केल्या असत्या, तर बेडची उपलब्धता होऊ शकली असती, पण जिल्‍हा स्‍तरावरील यंत्रणा बेड, ऑक्‍सिजन, रेमडेसिविर इंजेक्‍शन यांच्‍या उपाययोजनांमध्‍ये अडकून पडल्‍यामुळे इतर सुविधांचे सुनियंत्रण करण्‍यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

--------------

थोरातांच्या मंत्रिपदाचा काय फायदा?

मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्‍या टीकेला उत्‍तर देताना आ.विखे म्‍हाणाले की, नियतीने आम्‍हाला विरोधी पक्षात बसायची भूमिका दिली असली, तरी ती आम्‍ही यशस्‍वीपणे पार पाडत आहोत, पण तुम्‍हाला तर नियतीने मंत्री केले, याचा राज्‍याला आणि जिल्‍ह्याला काय फायदा झाला, असा खोचक सवाल त्‍यांनी केला. आघाडी सरकारच्‍या मंत्र्यांनी कोविड काळात केलेल्‍या कामाचे ऑडिट मुख्‍यमंत्र्यांनी करण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.