शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

चला पंढरीसी जाऊ! रखुमा-देवीवरा पाहू!!

By admin | Updated: June 28, 2014 01:11 IST

अहमदनगर : भागवत धर्माची भगवी पताका हातात घेऊन ‘चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, विठू माऊली तू माऊली जगाची असा विठ्ठल नामाचा गजर करीत

अहमदनगर : भागवत धर्माची भगवी पताका हातात घेऊन ‘चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, विठू माऊली तू माऊली जगाची असा विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरीच्या वाटेवर निघालेल्या देवगड दिंडीतील वारकऱ्यांची पावले शुक्रवारी नगरमध्ये विसावली़नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडी राज्यात शिस्तप्रिय समजली जाते़ श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे हे ४० वे वर्ष आहे. दरवर्षी श्री क्षेत्र देवगड येथील गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पंढरपूरला जाते़ या दिंडीचे शुक्रवारी (दि़२३) दुपारी नगर शहरात आगमन झाले. खांद्यावर भगवी पताका, पांढरा पोषाख, गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर पांढरी टोपी परिधान केलेले वारकरी ‘ज्ञानोबा-तुकाराम’, विठू माऊलीचा गजर करीत अग्रभागी होते़ त्यांच्यामागे भजनी मंडळ, चांदीच्या पुष्पांनी सजविलेल्या रथामध्ये किसनगिरी बाबांची प्रतिमा व प्राकृत पादुका त्यामागे ज्ञानोबा-तुकाराम व विठू माऊलीचा जयघोष करणाऱ्या महिला भाविक रांगेनेच शिस्तीचे दर्शन घडवित शहरात दाखल झाले़ दरम्यान वाटेत ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करतानाच अनेक भाविकांनी वारकऱ्यांसाठी फळे, पाणी वाटप केले़ दिंडी शहरातील वसंत टेकडी परिसरात पोहोचल्यानंतर तेथे प्रेस क्लब व फिनिक्स सोशल फौंडेशनच्या वतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषध वाटप करण्यात आले़ यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूरभाई शेख, जालिंदर बोरुडे, चंद्रकांत पालवे, मीनाताई मुनोत, डॉ़ प्रसन्नाकुमार खन्ना, डॉ़ संजय मेहेर, डॉ़ संदीप कळमकर आदी उपस्थित होते़ भास्करगिरी महाराज व सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली़ वसंत टेकडी परिसरात वारकऱ्यांनी दुपारचे भोजन केले़ त्यानंतर भास्करगिरी महाराज यांचे प्रवचन झाले़ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पालखी वसंत टेकडी येथून निघाल्यानंतर डीएसपी चौक, नटराज चौक, सर्जेपुरा, कापड बाजार, माळीवाडा मार्गे जावून लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मुक्कामी थांबली़ सकाळी आनंदऋषी समाधीस्थळमार्गे सोलापूर रस्त्याने पंढरपूरकडे मार्गस्थ होईल़दिंडीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या़ शहरात आ़ अनिल राठोड, संभाजी कदम, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, महापौर संग्राम जगताप यांच्यासह व्यापारी व भाविकांनी दिंडीचे जोरदार स्वागत केले़ अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़लवाजमा आणि सेवाधारीदिंडीतील वारकऱ्यांसाठी पाणी, भोजन, आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी दिंडीसोबत सुमारे १७ वाहनांचा ताफा आहे़ यामध्ये ७ ट्रका, ४ पाण्याचे टँकर, ३ ट्रॅक्टर, देवगड संस्थांनची रुग्णवाहिका, मिनीबस, मोठी बस अशा १७ वाहनांचा लवाजमा आणि सुमारे ५० सेवाधारी दिंडीसोबत आहेत़ यावर्षी सुमारे १६०० वारकरी दिंडीत सामिल झाले आहेत, अशी माहिती बाळू महाराज कानडे यांनी दिली़असा आहे वारकऱ्यांचा दिनक्रमसकाळी ३ वाजता वारकऱ्यांना जागविण्यासाठी सनई चौघडा सुरु होतो़ त्यानंतर सर्वांनी उरकून ४ वाजता काकडा भजन व आरती सुरु होते़ ५ वाजल्यानंतर चहापान होते़ ६़३० वाजता प्रार्थना केली जाते़ आणि त्यानंतर दिंडीचे मुक्कामाच्या ठिकाणाहून प्रस्थान होते़ सकाळी ९ वाजता अल्पोपहारासाठी दिंडी थांबते़ अल्पोपहार झाल्यानंतर पुन्हा दिंडी मार्गस्थ होते़ दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास दुपारचे भोजन, त्यानंतर प्रवचन होते़ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दिंडीतील वारकऱ्यांची पावले पुन्हा पंढरीच्या वाटेवर चालू लागतात़ ५ कि.मी़च्या प्रवासानंतर छोट्याशा विश्रांतीसाठी दिंडी पुन्हा थांबते़ तेथून निघाल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी विसावतात़ तेथे रात्री आरती, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम पार पडतात़