शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वीरगावात बिबट्याचा मृत्यू

By admin | Updated: April 1, 2016 00:51 IST

गणोरे : अकोले तालुक्यातील वीरगावच्या पश्चिमेस गुरूवारी पहाटे एका तरुण बिबट्यााचा मृत्यू झाला. दोन बिबट्यांची झुंज होऊन हा बिबट्या ठार झाल्याचे वन रक्षकांनी सांगितले.

गणोरे : अकोले तालुक्यातील वीरगावच्या पश्चिमेस गुरूवारी पहाटे एका तरुण बिबट्यााचा मृत्यू झाला. दोन बिबट्यांची झुंज होऊन हा बिबट्या ठार झाल्याचे वन रक्षकांनी सांगितले. मात्र, सकाळपासून मृतावस्थेत आढळलेला बिबट्या थेट संध्याकाळपर्यंत बेवारस पडलेला होता. त्याला पिंजऱ्यात न नेता एका साध्या गाडीत नेण्यात आले, पत्रकारांपासून माहिती लपवली, त्यामुळे या प्रकरणात वन विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. वीरगावमध्ये सकाळी हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. संध्याकाळी पाच वाजता रिक्षासारख्या एका लहान उघड्या गाडीत एका पोत्याच्या बारदानाखाली झाकून मृत बिबट्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नेले. त्या वेळी शेजारील कांदे काढणाऱ्या महिलांनी त्यांना जाब विचारला. परंतु कर्मचाऱ्यांनी घाईत सोपस्कार उरकले. एवढ्या गुप्त व आडमुठेपणाने केलेल्या मृत बिबट्या नेण्यासाठी केलेला प्रकार संशयास्पद ठरला आहे. बिबट्याचा सदर प्रवास वन विभागाच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवून करण्यात आल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.