शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यात प्रशासनासह नेते उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST

रोहित टेके लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहरातील मैलामिश्रित हानिकारक सांडपाणी गटारीद्वारे गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. मात्र, यावर ...

रोहित टेके

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : शहरातील मैलामिश्रित हानिकारक सांडपाणी गटारीद्वारे गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. मात्र, यावर उपाययोजना करण्यासाठी आजवरच्या नगर परिषदेचा कारभार हाकणारे नेते, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळेच हा प्रश्न आजतागायत सुटू शकला नाही. त्यामुळे ही मंडळी शहराच्या पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात अपयशी ठरली आहे.

कोपरगाव शहराची आजची लोकसंख्या सुमारे १ लाखावर आहे. तर घरांची संख्या ही २२ हजारांपेक्षा जास्त आहे. या सर्व घरांतून निघणारे सांडपाणी हे सरळसरळ गोदावरी नदीत सोडले जात आहे. शहराची लोकसंख्या ही गेल्या काही वर्षांत वाढली आहे; परंतु ज्या वेळी लोकसंख्या कमी होती. त्यावेळीदेखील या पाण्यावर कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. भविष्यातील वाढती लोकसंख्या गृहीत धरूनही कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. शहर विकासासाठी गेल्या अनेक वर्षांत विविध विकास आराखडे तयार करण्यात आले. त्यातून अनेक विकास कामांसह गटारींची कामे करण्यात आली. मात्र, या गटारींची कामे करताना नगर परिषदेचे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना या गटारीतून सरळसरळ गोदावरी नदीत वाहून जाणाऱ्या पाण्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात साधा प्रश्नही कधीच पडला नाही. विशेष म्हणजे वाढती लोकसंख्या गृहीत धरून चांगल्या पाण्याची मागणी करण्यात आली; परंतु सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत.

ज्या पद्धतीने शहरात विविध निधी आणून विकास कामे करून शोभा वाढविण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न झाले. प्रसंगी शासनाच्या स्वच्छतेसंदर्भातील विवध योजनांत सहभागी होऊन लाखोंची पारितोषिकेदेखील मिळविली. मात्र, शहरातील दररोज लाखो लिटर सांडपाणी गोदावरी नदीत सोडून दिले आणि शहराच्या दर्शनी भागात असलेल्या गोदावरी नदीची गटार गंगा करून ठेवली. त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भातील धारिष्ट कोणीच दाखविले नाही. हीदेखील विशेष बाब आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या आजवरच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना एवढ्या वर्षांत शहराचा साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. तर सांडपाण्याशी यांचा संबंध नसल्याचे म्हणता येईल.

..........

प्रदूषण नेमके थांबणार कधी?

इतक्या वर्षांनंतर मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी गोदावरी नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा १२५ कोटी खर्चाचा एस.टी.पी. प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून शासनस्तरावर मागील वर्षीच मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यावर अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. त्यामुळे हा प्रकल्पदेखील शहरवासीयांसाठी दिवास्वप्नच रहिला नाही म्हणजे झाले. गोदावरी नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी बंद कधी होणार, हे नगर परिषद प्रशासन आजही ठामपणे सांगू शकत नाही, हे तितकेच महत्त्वाचे आहे.

..........

कोपरगाव शहरातील सांडपाणी गोदावरी नदीत सोडण्यात येते. वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून यावर उपाययोजना करण्यासंदर्भात अभ्यासपूर्ण कृतिशील कार्यक्रम होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे झालेच नाही. मात्र, याविषयी फक्त पारावर बसूनच गप्पा रंगत राहिल्या. त्यामुळे उशिरा का होईना नगर परिषदेने यासंदर्भात पाठविलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून तो मार्गी लावून नदीचे प्रदूषण टाळावे.

-सुशांत घोडके, स्वच्छतादूत, कोपरगाव.

....