शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘कुल्हड’चा चहा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST

अहमदनगर : रेल्वेस्थानकांवर प्लास्टिकच्या कपाऐवजी ‘कुल्हड’मधून चहा देण्याचे रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी अहमदनगर जिल्ह्यात मात्र रेल्वेला याबाबतचे आदेश ...

अहमदनगर : रेल्वेस्थानकांवर प्लास्टिकच्या कपाऐवजी ‘कुल्हड’मधून चहा देण्याचे रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी अहमदनगर जिल्ह्यात मात्र रेल्वेला याबाबतचे आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे सध्यातरी जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर कागदी कपातून चहा मिळत आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देशातील सर्व रेल्वेस्थानके प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ‘कुल्हड’मधून चहा देण्याचा निर्णय घेतला. कुल्हड म्हणजे मातीचे बोळके (कप) होय. २००४ ते २००९ दरम्यान यूपीएच्या काळात लालूप्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री होते, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा रेल्वेस्टेशनवर कुल्हडमधून चहा देण्याची अंमलबजावणी केली होती. मात्र, त्यांचे मंत्रिपद जाताच हा उपक्रम बंद पडला व पुन्हा कागदाच्या, तसेच प्लास्टिकच्या कपातून चहा देण्यात येऊ लागला.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत नगर जिल्ह्यातून दौंड-मनमाड हा रेल्वे मार्ग जातो. याअंतर्गत जिल्ह्यात लहान-मोठी एकूण २३ रेल्वेस्थानके आहेत. यातील अहमदनगर व शिर्डी हीच दोन मोठी स्थानके आहेत. या ठिकाणी रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या ठेकेदाराकडून चहा किंवा खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. इतर रेल्वेस्थानकावर मात्र हात विक्रीतून चहा किंवा खाद्य पदार्थ मिळतात. या सर्व रेल्वेस्थानकांवर दररोज सुमारे सात ते आठ हजार कप चहाची विक्री होते. लॉकडाऊननंतर ही संख्या काहीशी कमी झाली आहे.

--------------

कुंभारांना मिळेल रोजगार

अजून तरी जिल्ह्यात ‘कुल्हड’मधून चहा मिळण्यास सुरुवात झालेली नाही. मात्र, प्रत्यक्ष याची अंमलबजावणी झाल्यानंतर ‘कुल्हड’ बनविणाऱ्या स्थानिक कुंभारांना रोजगार मिळेल. ‘कुल्हड’ वापरून फेकून दिले जातात. सध्या एक कुल्हड दीड ते अडीच रुपयांदरम्यान मिळते. यामुळे चहाचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे एका चहा विक्रेत्याने सांगितले.

-------------

कुल्हडमधून चहा देणे विक्रेत्यांसाठी गैरसोयीचे आहे. एक तर ते कागदी कपापेक्षा महाग असते आणि दुसरी गोष्ट सांभाळण्यासाठी जिकिरीचे असल्याने कुल्हडमधून चहा देणे गैरसोयीचे आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी कितपत होईल याबाबत शंका आहे.

- चहा विक्रेता