शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

तीन शाळकरी मुलांचे अपहरण

By admin | Updated: March 13, 2016 14:14 IST

अहमदनगर : एका खासगी क्लासला जाणाऱ्या तीन शाळकरी मुलांचे शुक्रवारी दुपारी एक वाजता नगर शहरातील महाजन गल्लीतून अपहरण झाले.

अहमदनगर : एका खासगी क्लासला जाणाऱ्या तीन शाळकरी मुलांचे शुक्रवारी दुपारी एक वाजता नगर शहरातील महाजन गल्लीतून अपहरण झाले.तेजस संभाजी निमसे (वय १४, रा. मांडवे, ता. नगर), अभिषेक चंद्रकांत म्याना (वय १४, रा. भराडगल्ली, तोफखाना), विशाल रवींद्र जाधव (वय १४, रा. पानसरे गल्ली, अर्बन बँक चौक) असे अपहरण झालेल्या मुलांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी ही मुले हरवल्याची तक्रार तेजसचे वडील संभाजी निमसे यांनी कोतवाली पोलिसांत दिली. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मुले हरवली की त्यांचे अपहरण झाले, याचा पोलीस शोध घेत आहेत. तेजस हा शाळेसाठी मांडवे येथून बसने येतो़ अन्य दोघे नगरचे आहेत. तिघेही खासगी क्लासला पायी जात असताना त्यांचे अपहरण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी शहरात शोधमोहीम हाती घेतली, मात्र शोध लागला नाही़रेल्वेने गेले फिरायलातिन्ही मुले १४ वर्षांची असल्याने अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही मुलांकडे प्रवास करण्याइतपत पैसे होते. ही मुले रेल्वेत बसून कुठेतरी फिरायला गेली आहेत. नगर-मनमाड, नगर-पुणे, नगर-सोलापूर मार्गावरील रेल्वे जंक्शनवर मुलांचा शोध घेतला. मात्र नक्की कोणत्या रेल्वेत बसून गेली, याचा शोध लागलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.