शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने खरिपातील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST

विठा घाटाच्या माथ्यावर चढून आले की, पावसाचा परिसर सुरू होतो. अगदी मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पाऊस येथे हजेरी लावत असतो. ...

विठा घाटाच्या माथ्यावर चढून आले की, पावसाचा परिसर सुरू होतो. अगदी मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पाऊस येथे हजेरी लावत असतो. या वर्षीही नेहमीप्रमाणे पावसाने या भागात हजेरी लावली. या पावसावर परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली व भात लागवडीसाठी रोपेही टाकली. मात्र यानंतर काही दिवसांत पुन्हा पावसाने दांडी मारली. भात खाचरांत पाणी आलेले नसल्याने भात लागवडी खोळंबल्या होत्या. पंधरा दिवसांची ओढ दिल्यानंतर या परिसरात धो-धो पाऊस पडला. ओढे-नाले भरून वाहू लागले आणि भात खाचरेही तुडुंब भरली. येथील बळीराजा सुखावला आणि खोळंबलेल्या भात लागवडी पूर्ण झाल्या. असे असले तरी या परिसराला साजेसा पाऊस अद्यापही बरसला नाही. जमिनीची तहान पूर्णपणे भागली नसल्याने पावसाचे प्रमाण कमी होताच येथील ओढे-नाले क्षीण होऊ लागले. त्यातच मागील पाच-सहा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने आता भात खाचरांतील पाणी एकदमच कमी झाल्याने भात पिके अडचणीत आली आहेत. दुसरीकडे भरात असलेल्या उडीद आणि सोयाबीनला आता चांगल्या शेंगा लागल्या आहेत. मात्र पावसाने ओढ दिल्याने या शेंगा भरतात की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.

..............

दिवसभर ऊन

मागील तीन दिवसांपासून आकाशातील ढगांची गर्दी कमी झाली असून, दिवसभर ऊन पडत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत.

.........................

धरणातील आवक थांबली

नगर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर येथेही मागील दोन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असल्याने येथील धबधबे क्षीण होत आहेत. यामुळे भंडारदरा धरणात येणाऱ्या नवीन पाण्याची आवकही थांबली असल्याने धरणसाठा ‘जैसे थे’ आहे.