शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

नागवडे कारखान्यावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST

श्रीगोंदा : नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस असताना राजेंद्र नागवडे यांनी सन २०१९ - २०चा गाळप हंगाम बंद ...

श्रीगोंदा : नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस असताना राजेंद्र नागवडे यांनी सन २०१९ - २०चा गाळप हंगाम बंद ठेवून कारखान्याची कामगार यंत्रणा स्वत:च्या दोन खासगी कारखान्यांसाठी वापरली. त्यात नागवडे कारखान्याचे २८ कोटींचे नुकसान केले. यावर राजेंद्र नागवडेंनी शिवाजीबापूंच्या स्मारकासमोर खुली चर्चा करावी, असे आव्हान नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

मगर म्हणाले की, सहवीज निर्मितीचा प्रकल्प वेळेवर सुरू केला नाही म्हणून ८० लाखांचे डिपॉझिट जप्त झाले. हरित लवादाची परवानगी नसल्याने ७० लाख दंड भरावा लागला. राजेंद्र नागवडे हे स्व. शिवाजीराव नागवडे यांचे चिरंजीव असले तरी त्यांना कारखाना चालविण्याचे ज्ञान नाही.

कारखान्याचे सहा चालक यांना कशासाठी लागतात? एवढे चालक मुख्यमंत्र्यांकडे तरी आहेत का? असा टोला शेलार यांनी नागवडेंना लगावला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले म्हणाले की, पक्षीय राजकारणात मी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर आहे, उद्याही राहणार. पण कारखान्याच्या बाबतीत मी केशव मगर यांना साथ करणार आहे.

यावेळी जिजाबापू शिंदे, वैभव पाचपुते, नंदुकुमार कोकाटे, बाळासाहेब काकडे, संजय जामदार, अजित जामदार, बापू भोस, नामदेव जठार, डॉ. दत्तात्रय नागवडे, बाळाप्पा पाचपुते, शांताराम भोयटे, रफिक इनामदार आदी उपस्थित होते.

----------

ज्यांना बापूंनी मोठे केले त्यांनीच विश्वासघात केला

श्रीगोंदा : नागवडे घराण्याने ६० वर्षांच्या वाटचालीत जनतेचा विश्वास संपादन केला. बापूंनी काहींना बोटाला धरून राजकारणात आणून कारखान्याची सत्ता ताब्यात दिली. परंतु बापूंचे निधन होताच कारखान्याच्या सत्तेवर डोळा ठेवून विश्वासघात करत त्यांनी विरोधात उडी मारली. त्यामुळे अशा गद्दारांचा कारखाना निवडणुकीत सभासद बुरखा फाडणार आहेत, असा टोला नागवडे साखर कारखान्याचे संचालक ॲड. सुनील भोस यांनी लगावला.

भोस पुढे म्हणाले की, शिवाजीराव नागवडे हयात असताना त्यांनी राजेंद्र नागवडे यांना कारखान्याचे अध्यक्ष केले. त्यांनीही कारखाना चांगला चालवून शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या तुलनेत चांगला भाव दिला. त्यावेळी केशव मगर यांना राजेंद्र नागवडेंना कारखाना चालविता येतो की नाही हे दिसले नाही का?

अण्णासाहेब शेलार हे कधी पंचायत समिती आणि कारखाना संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहात नाहीत. जनमताचा अनादर करतात. ते संस्थेपेक्षा स्वत:ला मोठे समजतात. स्वार्थासाठी आरोप, टिंगलटवाळी करणे, हा त्यांचा धंदा आहे. जनतेच्या हिताचे कोणते काम केले, हे त्यांनी दाखवून द्यावे, असे भोस म्हणाले.

बापूंनी तत्त्वनिष्ठेचे, जनहिताचे राजकारण केले. पण त्यांच्या घराण्यावर घाणेरडे आरोप करून पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना बापूंच्या स्मारकाला स्पर्श करण्याचा अधिकार नाही, असा टोलाही भोस यांनी लगावला.