शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

नागवडे कारखान्यावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST

श्रीगोंदा : नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस असताना राजेंद्र नागवडे यांनी सन २०१९ - २०चा गाळप हंगाम बंद ...

श्रीगोंदा : नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस असताना राजेंद्र नागवडे यांनी सन २०१९ - २०चा गाळप हंगाम बंद ठेवून कारखान्याची कामगार यंत्रणा स्वत:च्या दोन खासगी कारखान्यांसाठी वापरली. त्यात नागवडे कारखान्याचे २८ कोटींचे नुकसान केले. यावर राजेंद्र नागवडेंनी शिवाजीबापूंच्या स्मारकासमोर खुली चर्चा करावी, असे आव्हान नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

मगर म्हणाले की, सहवीज निर्मितीचा प्रकल्प वेळेवर सुरू केला नाही म्हणून ८० लाखांचे डिपॉझिट जप्त झाले. हरित लवादाची परवानगी नसल्याने ७० लाख दंड भरावा लागला. राजेंद्र नागवडे हे स्व. शिवाजीराव नागवडे यांचे चिरंजीव असले तरी त्यांना कारखाना चालविण्याचे ज्ञान नाही.

कारखान्याचे सहा चालक यांना कशासाठी लागतात? एवढे चालक मुख्यमंत्र्यांकडे तरी आहेत का? असा टोला शेलार यांनी नागवडेंना लगावला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले म्हणाले की, पक्षीय राजकारणात मी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर आहे, उद्याही राहणार. पण कारखान्याच्या बाबतीत मी केशव मगर यांना साथ करणार आहे.

यावेळी जिजाबापू शिंदे, वैभव पाचपुते, नंदुकुमार कोकाटे, बाळासाहेब काकडे, संजय जामदार, अजित जामदार, बापू भोस, नामदेव जठार, डॉ. दत्तात्रय नागवडे, बाळाप्पा पाचपुते, शांताराम भोयटे, रफिक इनामदार आदी उपस्थित होते.

----------

ज्यांना बापूंनी मोठे केले त्यांनीच विश्वासघात केला

श्रीगोंदा : नागवडे घराण्याने ६० वर्षांच्या वाटचालीत जनतेचा विश्वास संपादन केला. बापूंनी काहींना बोटाला धरून राजकारणात आणून कारखान्याची सत्ता ताब्यात दिली. परंतु बापूंचे निधन होताच कारखान्याच्या सत्तेवर डोळा ठेवून विश्वासघात करत त्यांनी विरोधात उडी मारली. त्यामुळे अशा गद्दारांचा कारखाना निवडणुकीत सभासद बुरखा फाडणार आहेत, असा टोला नागवडे साखर कारखान्याचे संचालक ॲड. सुनील भोस यांनी लगावला.

भोस पुढे म्हणाले की, शिवाजीराव नागवडे हयात असताना त्यांनी राजेंद्र नागवडे यांना कारखान्याचे अध्यक्ष केले. त्यांनीही कारखाना चांगला चालवून शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या तुलनेत चांगला भाव दिला. त्यावेळी केशव मगर यांना राजेंद्र नागवडेंना कारखाना चालविता येतो की नाही हे दिसले नाही का?

अण्णासाहेब शेलार हे कधी पंचायत समिती आणि कारखाना संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहात नाहीत. जनमताचा अनादर करतात. ते संस्थेपेक्षा स्वत:ला मोठे समजतात. स्वार्थासाठी आरोप, टिंगलटवाळी करणे, हा त्यांचा धंदा आहे. जनतेच्या हिताचे कोणते काम केले, हे त्यांनी दाखवून द्यावे, असे भोस म्हणाले.

बापूंनी तत्त्वनिष्ठेचे, जनहिताचे राजकारण केले. पण त्यांच्या घराण्यावर घाणेरडे आरोप करून पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना बापूंच्या स्मारकाला स्पर्श करण्याचा अधिकार नाही, असा टोलाही भोस यांनी लगावला.