शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

नागवडे कारखान्यावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST

श्रीगोंदा : नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस असताना राजेंद्र नागवडे यांनी सन २०१९ - २०चा गाळप हंगाम बंद ...

श्रीगोंदा : नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस असताना राजेंद्र नागवडे यांनी सन २०१९ - २०चा गाळप हंगाम बंद ठेवून कारखान्याची कामगार यंत्रणा स्वत:च्या दोन खासगी कारखान्यांसाठी वापरली. त्यात नागवडे कारखान्याचे २८ कोटींचे नुकसान केले. यावर राजेंद्र नागवडेंनी शिवाजीबापूंच्या स्मारकासमोर खुली चर्चा करावी, असे आव्हान नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

मगर म्हणाले की, सहवीज निर्मितीचा प्रकल्प वेळेवर सुरू केला नाही म्हणून ८० लाखांचे डिपॉझिट जप्त झाले. हरित लवादाची परवानगी नसल्याने ७० लाख दंड भरावा लागला. राजेंद्र नागवडे हे स्व. शिवाजीराव नागवडे यांचे चिरंजीव असले तरी त्यांना कारखाना चालविण्याचे ज्ञान नाही.

कारखान्याचे सहा चालक यांना कशासाठी लागतात? एवढे चालक मुख्यमंत्र्यांकडे तरी आहेत का? असा टोला शेलार यांनी नागवडेंना लगावला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले म्हणाले की, पक्षीय राजकारणात मी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर आहे, उद्याही राहणार. पण कारखान्याच्या बाबतीत मी केशव मगर यांना साथ करणार आहे.

यावेळी जिजाबापू शिंदे, वैभव पाचपुते, नंदुकुमार कोकाटे, बाळासाहेब काकडे, संजय जामदार, अजित जामदार, बापू भोस, नामदेव जठार, डॉ. दत्तात्रय नागवडे, बाळाप्पा पाचपुते, शांताराम भोयटे, रफिक इनामदार आदी उपस्थित होते.

----------

ज्यांना बापूंनी मोठे केले त्यांनीच विश्वासघात केला

श्रीगोंदा : नागवडे घराण्याने ६० वर्षांच्या वाटचालीत जनतेचा विश्वास संपादन केला. बापूंनी काहींना बोटाला धरून राजकारणात आणून कारखान्याची सत्ता ताब्यात दिली. परंतु बापूंचे निधन होताच कारखान्याच्या सत्तेवर डोळा ठेवून विश्वासघात करत त्यांनी विरोधात उडी मारली. त्यामुळे अशा गद्दारांचा कारखाना निवडणुकीत सभासद बुरखा फाडणार आहेत, असा टोला नागवडे साखर कारखान्याचे संचालक ॲड. सुनील भोस यांनी लगावला.

भोस पुढे म्हणाले की, शिवाजीराव नागवडे हयात असताना त्यांनी राजेंद्र नागवडे यांना कारखान्याचे अध्यक्ष केले. त्यांनीही कारखाना चांगला चालवून शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या तुलनेत चांगला भाव दिला. त्यावेळी केशव मगर यांना राजेंद्र नागवडेंना कारखाना चालविता येतो की नाही हे दिसले नाही का?

अण्णासाहेब शेलार हे कधी पंचायत समिती आणि कारखाना संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहात नाहीत. जनमताचा अनादर करतात. ते संस्थेपेक्षा स्वत:ला मोठे समजतात. स्वार्थासाठी आरोप, टिंगलटवाळी करणे, हा त्यांचा धंदा आहे. जनतेच्या हिताचे कोणते काम केले, हे त्यांनी दाखवून द्यावे, असे भोस म्हणाले.

बापूंनी तत्त्वनिष्ठेचे, जनहिताचे राजकारण केले. पण त्यांच्या घराण्यावर घाणेरडे आरोप करून पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना बापूंच्या स्मारकाला स्पर्श करण्याचा अधिकार नाही, असा टोलाही भोस यांनी लगावला.