शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

कल्याण रोड परिसर टाकतोय कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीपासून हाकेच्या अंतरावर असलेला कल्याण रोड परिसर आता कात टाकतोय. नवनवीन इमारती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीपासून हाकेच्या अंतरावर असलेला कल्याण रोड परिसर आता कात टाकतोय. नवनवीन इमारती उभ्या राहत असून, आदर्श म्हणता येतील, अशा कॉलनी उभ्या राहत आहेत. म्हणूनच फूडमॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पेट्रोलपंप, सुसज्ज दवाखाने, जॉगिंग ट्रॅक, बगिचा अशा सुविधा या भागात उभ्या राहिल्या आहेत. त्याशिवाय अनेक छोट्या-छोट्या उद्योगांनीही या भागाच्या विकासाला हातभार लावला आहे.

अहमदनगर शहर आता ५३१ वर्षांचे झाले आहे. मध्यवस्तीतील अनेकजण आता नव्याने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये राहायला जात आहेत. कल्याण रोड परिसरही आता एक नवीन उपनगर म्हणून उदयास आले आहे. शिवाजीनगर, आदर्शनगर, विद्या कॉलनी अशा उच्चशिक्षितांच्या कॉलनी उभ्या राहिल्या आहेत. नव्यानेही अनेक कॉलनींची यात भर पडली आहे.

मागील २० वर्षांच्या तुलनेत कल्याण रोड परिसराला चांगलीच झळाळी आली आहे. पूर्वी वेड्या बाभळींनी हा परिसर वेढलेला होता. रात्रीच्या वेळी सीना नदी ओलांडून येण्याचे धाडस कोणी करीत नव्हते. मात्र, आता हा परिसर माणसांनी गजबजला असून, चकाचक बंगले, कॉलनी उभ्या राहिल्या आहेत. सिमेंट, डांबरी मुलाम्याने अंतर्गत रस्ते चकाचक झाले आहेत. त्यामुळे या भागात फूडमॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे राहिले. बाजारपेठ उदयास आली. सुसज्ज दवाखान्यांनी या भागातील नागरिकांचे आरोग्य जपण्यात सहयोग दिला. दळणवळणाची लाइफलाइन असलेला पेट्रोलपंपही या भागात सुरू झाला. मंगल कार्यालये उभी राहिली. नागरिकांना मॉर्निंग वॉकला जाता यावे यासाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला. लोकांच्या विरंगुळ्यासाठी ३५ लाख रुपये खर्चून बगिचा उभा करण्यात आला आहे.

गणपती कारखान्यांसह इतर छोट्या उद्योगांनी या परिसरातील गरजूंना रोजगारही पुरविला आहे.

........................

पाणीप्रश्न सुटणे गरजेचे

कल्याण रोड परिसराची लोकसंख्या २५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. या लोकसंख्येला मात्र अद्यापही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या भागासाठी स्वतंत्र पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याची योजना आखली होती. त्यासाठी दहा वर्षांपूर्वी दहा लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र, अद्यापही ती बंदच आहे. त्यामुळे सध्या तीन लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाकीतून या भागाला पाणीपुरवठा होत आहे. आठ ते दहा दिवसांनी या भागात पिण्याचे पाणी सुटते. ही या भागातील गंभीर समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

...................

गटारींसाठी २८ कोटी मंजूर

नगर-कल्याण महामार्गालगत गटार काढण्यात आली नव्हती. त्यामुळे या भागातील पाण्याचा निचरा होत नव्हता. मात्र, आता या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या गटारीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी २८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या गटारींची कामे झाल्यानंतर या भागातील पाणी निचऱ्याचा प्रश्नही बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे.

................

जॉगिंग ट्रॅक, लॉन व ओपन स्पेस विकास अशी काही कामे मार्गी लावली आहेत. या भागातील पाणीप्रश्न व इतर सुविधांसाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. आयुक्त शंकर गोरे यांच्याकडून चांगले सहकार्य मिळत असून, विकासकामांचे नियोजन करून हा परिसर आदर्श करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे.

-श्याम नळकांडे, नगरसेवक

..............

या भागात चांगले मॉल उभे राहत आहेत. होलसेलची मोठी दुकाने सुरू होत आहेत. महामार्गालगत असल्यामुळे बाजारपेठ विकसित होत आहे. मात्र, महापालिकेकडून सुविधा मिळत नाहीत. पाणीप्रश्न ही येथील मोठी समस्या आहे. फेज-२चे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. येथील बाजारपेठेला चांगले दिवस यायचे असतील तर महापालिकेने पाणीप्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे आहे.

-अंबादास नरसाळे, उद्योजक