शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

कळमकर यांना व्हायचेय मुख्यमंत्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 00:31 IST

अहमदनगर : राजकारणात महत्त्वाकांक्षा असाव्यात. कोण कधी कुठे असेल ते सांगता येत नाही. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशी अपेक्षा बाळगणे राजकारणात चुकीचे नाही

अहमदनगर : राजकारणात महत्त्वाकांक्षा असाव्यात. कोण कधी कुठे असेल ते सांगता येत नाही. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशी अपेक्षा बाळगणे राजकारणात चुकीचे नाही. महापौरपदाची खुर्ची काटेरी आहे. काम करण्यासाठी वर्षभराचा कालावधी कमी मिळाला, मात्र केलेल्या कामात समाधानी आहे. स्वप्न खूप होते, मात्र त्याला मर्यादाही आल्या. महापौर झाल्यानंतर खूप काही शिकायला मिळाले, अशी प्रांजळ कबुली मावळते महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकारांना दिली. महापौर अभिषेक कळमकर यांचा महापौरपदाचा कार्यकाळ गुरुवारी (दि.३०) संपला. या पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. ‘तुम्ही मुख्यमंत्री होणार, तर त्यासाठी आधी आमदार व्हावे लागेल’, या पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘आमदार होण्यासाठी फक्त अहमदनगर शहर हाच एकमेव मतदारसंघ नाही. जिल्ह्यात १२ विधानसभेचे मतदारसंघ आहेत. शिवाय मतदारसंघ नसतानाही आमदार होता येते.’ राजकारण प्रवेशाचा किस्सा हळूवारपणे उलगडत कळमकर यांनी थेट शहराच्या समस्यांवर भाष्य केले. खड्डेमुक्त शहर करण्याचा पहिल्यांदा निर्धार केला. एकही खड्डा शहरात राहिला नाही पाहिजे, असा पहिल्याच दिवशी संकल्प केला. मात्र हा निर्णय आमलात आणताना खूप अडथळे आले. महापौरपदाची खुर्ची जेवढी मानाची असते, तेवढीच ती काटेरी होती, याचा अनुभव मिळाला. महापालिकेची आर्थिक स्थिती, विरोधकांची टीका आणि अकार्यक्षम प्रशासन या गोष्टींमुळे खड्डेमुक्त शहर करण्यात अडचणी निर्माण झाल्या. आढावा बैठकांमधून शहराचे प्रश्न समजले. मात्र आढावा बैठकांमधून काहीच निष्पन्न होत नसल्याचेही दिसले. अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांशी थेट संवाद साधता आला. त्यातूनही शहराच्या गरजा कळत गेल्या. चांगल्या कामासाठी कमी कार्यकाळ मिळाला, याची खंत वाटते. विकास कामे करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागला. मात्र दादा कळमकर, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप यांचे मार्गदर्शन असल्यामुळे काम करणे सोपे गेले. विरोधकांना सोबत घेवून कामे केली. घरकुल योजनेमुळे बेघरांच्या चेहऱ्यावर हसू फुलविता आले, याचे मोठे समाधान आहे. हे काम माझ्या हातून झाले, याचे समाधान आहे. मूलभूत विकास कामांसाठी ४० कोटी रुपयांचा निधी संघर्ष करून मिळविता आला, ही माझ्या कार्यकाळातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. शहरात २५ वर्षात आमदार निधी खर्च झाला नाही, म्हणून विकास झाला नाही.(प्रतिनिधी)अमरधाममधील सुविधांचे कार्यारंभ आदेश नसताना उद्घाटन झाले. मात्र तो कार्यारंभ आदेश लगेच दुपारी दिला. यापूर्वी अशी कामे झाली नव्हती का? कार्यारंभ आदेश नसताना काम सुरू झाले हे काही पहिल्यांदा घडले नाही. मात्र विरोधकांनी त्याचेही राजकारण केले. कायदेशीरपणे कार्यवाही झाली पाहिजे, मात्र अमरधाममध्ये सुविधा देणे महत्त्वाचे आहे. फेज टुशी संबंधित अनेक कामे मार्गी लावली. मात्र फेज टू योजनेचा ठेकेदार बदलल्याशिवाय ही योजना चांगल्या पद्धतीने मार्गी लागणार नाही. शास्तीमाफीच्या निर्णयातही खोडा घातला, यासारखे दुर्दैव नाही. प्रभागापुरता विचार करणारे नगरसेवक असल्याने शहराचा विकास मागे पडला आहे. चांगल्या निर्णयात खोळंबा आणणे एवढेच विरोधक काम करतात.महापौर होण्यासाठी मोठा घोडेबाजार करावा लागतो, हे सर्वश्रुत आहे. त्यासाठी कोणी तयार नव्हता. त्यामुळे पक्षाने उमेदवार दिला नाही. भाजपसोबत जाण्याचा निर्णय श्रेष्ठींचा होता आणि त्यामध्ये आम्हाला संकोच वाटला नाही. राष्ट्रवादीने निवडणूक लढविली नाही, त्यामुळे पराभव झाला असे म्हणणे किंवा सत्ता हातून गेली, असे म्हणणे गैर आहे.एक वर्षाचा कालावधी असल्याने मला वेळ देता आला नाही, अन्यथा एका एका अधिकारी व कर्मचाऱ्याच्या मागे लागलो असतो. प्रशासनाने सहकार्य केले, मात्र ते अधिक सक्षम बनवावे लागेल. अधिकारी निष्क्रिय आहेत. आर्थिक स्त्रोत संपुष्टात आलेले आहेत. स्वप्न खूप पाहिले, मात्र त्यावर अडचणींच्या मर्यादा होत्या. विलास ढगे हे सक्षम व धाडसी आयुक्त होते. तीन आयुक्त पाहणारा मी पहिला महापौर आहे. स्वीय सहायक लाचखोर निघाला, हे वाईट घडले. मात्र ज्यांना उभे केले, त्यांनी जाणीव ठेवली नाही, याची सल मनात आहे. पक्षाने मला काम करताना स्वातंत्र्य दिले. कोणाचाही दबाव नव्हता.