शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

विठुमाउलीसाठी जीव आसुसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

आषाढी एकादशी एक महिन्यावर येऊन ठेपली की नाशिक, नगर जिल्ह्यांतील हजारो वारकऱ्यांचे पाय पंढरपूरच्या दिशेने निघतात. जवळपास एक ...

आषाढी एकादशी एक महिन्यावर येऊन ठेपली की नाशिक, नगर जिल्ह्यांतील हजारो वारकऱ्यांचे पाय पंढरपूरच्या दिशेने निघतात. जवळपास एक महिना मजल दर मजल करत वारकरी भक्तिरसात तल्लीन होऊन विठुरायाला भेटायला जातात. मागील वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने वारी बंद करून प्रातिनिधिक स्वरूपात वारी काढून आषाढी साजरी केली होती. यंदा देखील कोरोनाचे संकट अजूनही गडद आहे, रुग्णसंख्या मंदावली असली तरी कोरोना आजार गेला असं म्हणता येणार नाही. शासन स्तरावर कोरोनाचा विळखा थोडा सैल झाल्यामुळे मानाच्या दहा पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे. देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यांसाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.

परंपरा खंडित करून भाविकांचा अंत न पाहता पंढरपूरला वारीत जाणाऱ्या प्रत्येक भाविकाची कोरोना चाचणी करून त्यांना लस देऊन यंदा वारीचा सोहळा व्हायला हवा होता. वर्षानुवर्षे सवय झालेल्या मार्गाला वारकऱ्यांचा पदस्पर्श यंदाही होणार नाही. वारकऱ्यांसह हा मार्गही विठुमाउलीच्या भेटीसाठी आसुसला आहे.

.....................

सोहळा व्हायला हवा होता...

⏺️गतवर्षी कोरोनाचे संकट नवे होते. परंतु सध्या परिस्थिती सुधारलेली आहे, यामुळे शारीरिक अंतर ठेवून आषाढी यात्रेचा सोहळा कमी लोकांमध्ये तरी झाला पाहिजे होता. परंपरेचा हा सोहळा आहे. मानाच्या पालख्यांसह किमान ५०० वारकऱ्यांना पायी चालत येण्याची परवानगी देण्यात यायला हवी होती. वारकरी संप्रदाय नक्कीच सरकारवर नाराज आहे.

- हभप मोहन महाराज बेलापूरकर, प्रमुख मानकरी, श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी सोहळा.

..........................

दर्शनासाठी पालखी मार्गही आसुसला....

⏺️नाशिक जिल्हा सोडल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताना पारेगाव (ता. संगमनेर) येथे या पालखीचा पहिला मुक्काम. त्यानंतर गोगलगाव, राजुरी (ता. राहाता) बेलापूर (ता. श्रीरामपूर) राहुरी, डोंगरगण (ता. नगर) दोन दिवस अहमदनगर शहर, साकत (ता. श्रीगोंदा) घोगरगाव, मिरजगाव (ता. जामखेड) कर्जत, कोरेगाव असे आठ दिवस या पालखी सोहळ्याचा अहमदनगर जिल्ह्यातील मुक्काम व मार्ग. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता हा पालखी सोहळा थेट पंढरपूरला जाणार असल्याने हा पालखी मार्गही विठुमाउलीच्या दर्शनासाठी आसुसला आहे.

...................

आनंद सोहळ्याला मुकलो....

⏺️अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताना पारेगाव (ता. संगमनेर) येथे या पालखीचा पहिला मुक्काम. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची आणि जिल्ह्याच्या वतीने या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याची एक मोठी पर्वणीच असते. पण यावर्षीही पालखी सोहळा नसल्यामुळे त्याची खंत नक्कीच आहे. या आनंद सोहळ्याला यंदाही मुकलो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीत खंड पडू नये म्हणून सुरक्षा वारी, असा संदेश देत-घेत वारी व्हायला हवी होती.

- डॉ. संध्या त्र्यंबक गडाख, सरपंच, पारेगाव (ता. संगमनेर)

.................

⏺️वारी हा महाराष्ट्रातील भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. सध्याची कोरोनाची स्थिती व वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता. कोरोनाची साथ आहे हे खरे असले तरी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन, बंदोबस्तामध्ये जनभावनेचा विचार करून मोजक्याच भाविकांसह परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्यास चालत जाण्याची परवानगी देणे गरजेचे होते.

- शामराव वाणी, वारकरी, पढेगाव(ता. श्रीरामपूर)

250621\img_20190624_171239716.jpg

दोन वर्षापूर्वी (२०१९) आषाढी वारीसाठी पंढरपूर कडे मजल दरमजल करत निघालेल्याश्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे संग्रहीत छायाचित्र.