शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

विठुमाउलीसाठी जीव आसुसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST

आषाढी एकादशी एक महिन्यावर येऊन ठेपली की नाशिक, नगर जिल्ह्यांतील हजारो वारकऱ्यांचे पाय पंढरपूरच्या दिशेने निघतात. जवळपास एक ...

आषाढी एकादशी एक महिन्यावर येऊन ठेपली की नाशिक, नगर जिल्ह्यांतील हजारो वारकऱ्यांचे पाय पंढरपूरच्या दिशेने निघतात. जवळपास एक महिना मजल दर मजल करत वारकरी भक्तिरसात तल्लीन होऊन विठुरायाला भेटायला जातात. मागील वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने वारी बंद करून प्रातिनिधिक स्वरूपात वारी काढून आषाढी साजरी केली होती. यंदा देखील कोरोनाचे संकट अजूनही गडद आहे, रुग्णसंख्या मंदावली असली तरी कोरोना आजार गेला असं म्हणता येणार नाही. शासन स्तरावर कोरोनाचा विळखा थोडा सैल झाल्यामुळे मानाच्या दहा पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे. देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यांसाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.

परंपरा खंडित करून भाविकांचा अंत न पाहता पंढरपूरला वारीत जाणाऱ्या प्रत्येक भाविकाची कोरोना चाचणी करून त्यांना लस देऊन यंदा वारीचा सोहळा व्हायला हवा होता. वर्षानुवर्षे सवय झालेल्या मार्गाला वारकऱ्यांचा पदस्पर्श यंदाही होणार नाही. वारकऱ्यांसह हा मार्गही विठुमाउलीच्या भेटीसाठी आसुसला आहे.

.....................

सोहळा व्हायला हवा होता...

⏺️गतवर्षी कोरोनाचे संकट नवे होते. परंतु सध्या परिस्थिती सुधारलेली आहे, यामुळे शारीरिक अंतर ठेवून आषाढी यात्रेचा सोहळा कमी लोकांमध्ये तरी झाला पाहिजे होता. परंपरेचा हा सोहळा आहे. मानाच्या पालख्यांसह किमान ५०० वारकऱ्यांना पायी चालत येण्याची परवानगी देण्यात यायला हवी होती. वारकरी संप्रदाय नक्कीच सरकारवर नाराज आहे.

- हभप मोहन महाराज बेलापूरकर, प्रमुख मानकरी, श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी सोहळा.

..........................

दर्शनासाठी पालखी मार्गही आसुसला....

⏺️नाशिक जिल्हा सोडल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताना पारेगाव (ता. संगमनेर) येथे या पालखीचा पहिला मुक्काम. त्यानंतर गोगलगाव, राजुरी (ता. राहाता) बेलापूर (ता. श्रीरामपूर) राहुरी, डोंगरगण (ता. नगर) दोन दिवस अहमदनगर शहर, साकत (ता. श्रीगोंदा) घोगरगाव, मिरजगाव (ता. जामखेड) कर्जत, कोरेगाव असे आठ दिवस या पालखी सोहळ्याचा अहमदनगर जिल्ह्यातील मुक्काम व मार्ग. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता हा पालखी सोहळा थेट पंढरपूरला जाणार असल्याने हा पालखी मार्गही विठुमाउलीच्या दर्शनासाठी आसुसला आहे.

...................

आनंद सोहळ्याला मुकलो....

⏺️अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताना पारेगाव (ता. संगमनेर) येथे या पालखीचा पहिला मुक्काम. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची आणि जिल्ह्याच्या वतीने या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याची एक मोठी पर्वणीच असते. पण यावर्षीही पालखी सोहळा नसल्यामुळे त्याची खंत नक्कीच आहे. या आनंद सोहळ्याला यंदाही मुकलो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीत खंड पडू नये म्हणून सुरक्षा वारी, असा संदेश देत-घेत वारी व्हायला हवी होती.

- डॉ. संध्या त्र्यंबक गडाख, सरपंच, पारेगाव (ता. संगमनेर)

.................

⏺️वारी हा महाराष्ट्रातील भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. सध्याची कोरोनाची स्थिती व वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता. कोरोनाची साथ आहे हे खरे असले तरी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन, बंदोबस्तामध्ये जनभावनेचा विचार करून मोजक्याच भाविकांसह परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्यास चालत जाण्याची परवानगी देणे गरजेचे होते.

- शामराव वाणी, वारकरी, पढेगाव(ता. श्रीरामपूर)

250621\img_20190624_171239716.jpg

दोन वर्षापूर्वी (२०१९) आषाढी वारीसाठी पंढरपूर कडे मजल दरमजल करत निघालेल्याश्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे संग्रहीत छायाचित्र.